राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र ; पंचायत समितीत भाजप – मनसे युती?

पालघर प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो एकाच बॅनरवर झळकले आहेत. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. राज ठाकरे आणि नरेंन्द्र मोदी एकाच बॅनरवर दिसल्याने कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत. लाव रे तो व्हिडिओ च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींविरोधात रान पेटवले … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यात पोहोचले नाहीत? येथे करा तक्रार

नवी दिल्ली  | नवीन वर्षाच्या सुरूवातीला भारत सरकारने शेतकर्‍यांना एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा टप्पा सरकारने सुरू केला आहे. या योजनेत सरकारने देशातील 6 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठविले आहेत. तथापि, जर या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत तर काळजी करण्याचे कारण नाही, कारण आपण आता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करू … Read more

देशातील तरुणाईला अराजकता, घराणेशाही आवडत नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित केले. आपल्या भाषणात युवा वर्गाला संबोधित करताना ते म्हणाले की, आजच्या युवकांना अराजकता आवडत नाही. त्यांना घराणेशाही, जातीवाद आवडत नाही. चांगल्या व्यवस्थेला त्यांची पसंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 2019 या वर्षाला निरोप देण्यासाठी काही क्षणच आता आपल्यासमोर राहिले आहेत. … Read more

हे अराजकतेच लक्षण, आपली वाटचाल पाकिस्तानच्या दिशेने – भालचंद्र नेमाडे

मुंबई | सध्या देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या मुद्यावरून उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण या कायद्याला विरोध करताना दिसत आहेत. साहित्यिक, ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी देखील नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर भाष्य केले आहे. नेमाडे यांनी म्हंटले की, हे अराजकतेच लक्षण आहे. यातून आपल्याला बाहेर पडता येणं कठीण आहे. आपल्या देशात अशी परिस्थिती … Read more

भारत धर्मशाळा आहे का?; राज ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई प्रतिनिधी | देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन पेटले आहे . यापार्श्वभूमीवर आता मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली . सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. १३५ कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता … Read more

पंतप्रधान मोदींनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिल्ली | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांना दिर्घायुष्य लाभो आणि आरोग्यमय आयुष्य लाभो यासाठी मोदी यांनी प्रार्थना केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज ट्विट करुन पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त देशभरातून पवार … Read more

आर्थिक आघाडीवर मोदी सरकारला आणखी एक धक्का, जीडीपी वाढीचा वेग ५ टक्केच राहील

सर्वसामान्यांना धक्का देणाऱ्या रिझर्व बँकेने मोदी सरकारलाही धक्के दिले आहेत. या आर्थिक वर्षात विकास दर वाढीचा वेग ६.१ टक्के राहील असा अंदाज वर्तवणाऱ्या रिझर्व बँकेन आता त्यात १.१ टक्क्याची कपात केली आहे. या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा वेग ५ टक्केच राहील, असा अंदाज रिझर्व बँकेने व्यक्त केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारवरच आर्थिक मंदीचं संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शरद पवारांना भाजपकडून खरोखर राष्ट्रपती पदाची आॅफर आहे का?

मुंबई | राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तास्थापनेबाबत बैठकांवर बैठका घेत असताना भाजपने मास्टरस्ट्रोक ठोकला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपकडून राष्ट्रपती पदाची आॅफर असल्याचं बोललं जात आहे. एनडीटीव्हीने पवारांना राष्ट्रपती पदाची आॅफर असल्याचं वृत्त दिले आहे. शरद पवार आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची भेट घेणार आहेत. … Read more

मोदी-शहांच्या सभांचा चांगला परिणाम होतोय – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची आज सातारा येथे प्रचार सभा पार पडली. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आलेल्या मोदी यांनी यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीवर कडाडून टीका केलीय. मात्र आता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मोदी, शहा यांच्या प्रचार सभांचा चागला परिणाम होत असल्याचं म्हणालेत. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी आणि अमित शहा जितक्या सभा घेतील … Read more

भारतात येडा पंतप्रधान बसलाय – प्रकाश आंबेडकर

जालना प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांचा येडा पंतप्रधान असा उल्लेख करत टीका केली आहे. जालना येथे बलुतेदार-आलुतेदार निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

सध्या आरएसएसवाले एक टीआरपी खूप वापरतात तो म्हणजे मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हात हातात घेऊन टाळी दिल्याचा. पण ट्रम्पने मोदीला दिलेल्या एका टाळीची किंमत भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोजावी लागणार असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय. चीन आणि अमेरिकेत व्यापारी युद्ध सुरु असून चीन आता अमेरिकेचा कापूस घेणार नसल्याचं पक्क आहे. अशात अमेरिका तो कापूस भारताला देइल आणि भारतातील कापूस उत्पासकांचे नुकसान होईल असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

मोदींना लोकप्रियतेची चटक आहे. अमेरिकेसारखे देश याचा फायदा घेऊन त्यांचा व्यापार आपल्या देशात वाढवत आहेत. यासर्वाचा फटका इथल्या शेतकर्‍यांना बसणार आहे असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
[youtube https://www.youtube.com/watch?v=SjcKU-JeGQ8&w=560&h=315]