शिरढोणमध्ये स्वाभिमानीने ऊसतोडी बंद पाडत रोखली वाहने

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ऊसदराचा तोडगा निघाल्याशिवाय गाळप हंगाम करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देत आज कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोणमधील ऊसतोडी बंद पाडल्या. याशिवाय वांगी येथून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरची हवा सोडून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी गाळप सुरु केले असले तरी अद्याप दराचा तोडगा निघालेला नाही. रविवारी कोल्हापुरात स्वाभिमानी … Read more

ऊस हंगामाच्या तोंडावर कारखान्यांचे गाळप परवाने पेंडिंग

सांगली प्रतिनिधी | प्रलंबित ‘एफआरपी’ तसेच सरकारी देणी देण्यास विलंब या कारणांसहित साखर आयुक्त कार्यालयाने कोल्हापूर विभागातील १८ कारखान्यांचे गाळप परवाने आज अखेर पेंडिंग ठेवले आहेत. साखर हंगाम तोंडावर असताना परवाने पेंडिंग ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेंडिंग ठेवलेल्या कारखान्यांना १३ नोव्हेंबरला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आलेली आहे. पेंडिंग ठेवलेल्या साखर कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील … Read more

‘या’ कारणामुळे उद्धव ठाकरें समोर वृद्ध शेतकरी ढसाढसा रडला

लातूर प्रतिनिधी | शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीची व्यथा उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडताना एका वृध्द शेतकऱ्याने हंबरडा फोडला. नांदेड जिल्ह्यातील कंधार मधल्या किरोळा इथं उद्धव ठाकरे हे बाधित पिकांची पाहणी करण्यासाठी गेले असता तिथे एका शेतकर्‍याने ठाकरे यांच्यासमोर ढसाढसा रडायला सुरवात केली. … Read more

मी पुन्हा येणार म्हणणार्‍या फडणवीसांच्या दौऱ्या दरम्यान शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बुलडाणा प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी बुलडाणा दौर्‍यावर असताना एका शेतकर्‍यांने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुन्हा आणू भाजपचे सरकार असं लिहीलेला टीशर्ट घालून शेतकर्‍यांने आत्महत्या केल्याने याची जोरदार चर्चा सुरु आहे. सदर घटना कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदार संघात घटली आहे. शेगाव तालुक्यातील खातखेड येथे सकाळी ११ वाजता सदर शेतकर्‍याने … Read more

शेतकर्‍यांचे उभे पीक केले उद्धवस्त, शिवबाच्या राज्यात वनाधिकाऱ्यांचे तुघलकी वागणे

अहमदनगर प्रतिनिधी | मुघलांनाही लाजवेल असे काम कर्जत तालुक्यात वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी केले आहे. केवळ वन जमिनीवर भात लागवड केली म्हणून आदिवासींचे उभे पीक या अधिकाऱ्यांनी संगनमताने उध्वस्त केले आहे. माझ्या राज्यातील रयतेच्या गवताच्या काडीलाही धक्का लागता कामा नये अशी शिवनीती होती. सध्याचे राज्यकर्ते उठताबसता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात आणि काम मात्र त्याच्या … Read more

औरंगाबादेत चोरीचे सत्र काही थांबेना, महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडले

औरंगाबाद प्रतिनिधी। औरंगाबादेत चोरीचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. शेतवस्तीतील घरात झोपलेल्या शेतकऱ्यांना दरोडेखोरांनी मारहाण करीत महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री मिसारवाडी भागात घडली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड भीतीच वातावरण पसरलय. मिसारवाडी भागात प्रकाश पारगावकर यांची शेती आहे. या शेतीत गजानन सोनाजी सणांसे हे बटाई ने शेती कसतात, शेतात दिवसभराचे काम आटोपून … Read more

पाटबंधारे विभागाचे नावाने शेतकऱ्यांनी केले प्रतिकात्मक पिंडदान

अहमदनगर प्रतिनिधी। नांदूर मधमेश्वर धरणातून वाहणाऱ्या ओव्हर फ्लोच्या पाण्याने पुणतांबा परिसरातील पाझर तलाव भरून द्यावेत, या मागणीसाठी शिर्डी जवळील पुणतांबा येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे प्रतिकात्मक पिंडदान करत, शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचा दशक्रीया विधी घालून, अनोख आंदोलन केले. गोदावरी नदीच्या तीरावर असलेलल्या पुणतांबा गावातील शेतकरी पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी आजही संघर्ष करत आहेत. … Read more

जो पर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत विसर्जन नाही, शेतकर्‍यांचे बाप्पासमोरच उपोषण

सोलापूर प्रतिनिधी | लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यासाठी राज्यभरात जोरदार जल्लोष सुरु असतानाच इकडे पंढरपूर तालुक्यात मात्र पाण्यासाठी शेतकर्यांनी गणरायापुढेच उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत नीरा कालव्यातून पाणी मिळत नाही तो पर्यंत गणपती बाप्पाचे विसर्जन करणार नाही असा पवित्रा येथील शेतकर्यांनी घेतल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

नीरा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून पंढरपूर,सांगोला आणि माळशिरस तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पाऊस नसल्याने शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे भीमा आणि नीरा नदीला पुर आलेला असतानाच दुसरीकडे मात्र याच भागातील शेतकर्यांना पाण्यासाठी गणपती बप्पासमोरच आंदोलन कऱण्याची वेळ आली आहे.

गणपती बप्पाचे विसर्जन करण्यासाठी अनेक गावात पाणीच नसल्याने गणरायाचे विसर्जन कसे करायाचे अशी चिंता देखील गणेश भक्तांना लागली आहे,अशातच आज पंढरपूर तालुक्यातील खर्डी, उंबरगाव, कासेगाव, या भागातील शेतकर्यांनी चक्का गणरायासमोरच उपोषण सुरु केले आहे.इतकेच ऩाही तर पाणी मिळाल्याशिवाय गणरायाचे विसर्जन करणार नाही असा इशारा येथील शेतकरी सचिन ताटे यांनी दिला आहे. पाण्यासाठी गणरायाचे विसर्जन थांबविण्याची वेळ या भागातील शेतकर्यांवर पहिल्यांदाच आल्याने येथील शेतकर्यांच्या उपोषणाची परिसरात चर्चा सुरु झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

दंगल गर्ल बबिता फोगाटचा पोलिस दलातून राजीनामा, भाजपकडून लढणार विधानसभा

आता कार्ड जवळ नसेल तरीही ATM मधून पैसे काढता येणार, पहा काय आहे प्रक्रीया

तर शरद पवारांचे माढ्यात डीपॉझीट जप्त केले असते : जयसिंह मोहिते पाटील

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

इकडे आड तिकडे विहीर ; राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या अडचणीत वाढ