शरद पवार अनभिज्ञ, राष्ट्रवादीच्या सुत्रांची माहिती

विशेष प्रतिनिधी | शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र आता या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनभिज्ञ असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

‘प्रिय देवेंद्रजी, तुम्ही मुख्यमंत्री पदी नसणार ‘! देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून चाहत्याची ‘खंत’

‘मी पुन्हा येईन’ असं देवेंद्र फडणवीस म्हणत असतानाच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा अनपेक्षित निकाल लागला. आणि ‘सत्ता स्थापन करणारच’ असा आत्मविश्वास असणाऱ्या भाजपा , अर्थातच ‘महायुती’ला मोठा धक्का बसला. मुख्यमंत्री पदावरून बिनसल्याने ‘महायुती’मधील दोन बडे पक्ष असलेल्या भाजपा आणि शिवसेना दोघांनी देखील एकमेकांसोबत काडीमोड घेतला. याचा परिणाम म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छा लोप पावली. आता आपल्या लाडक्या माजी मुख्यमंत्र्यासाठी त्यांच्याच एका चाहत्याने पत्र लिहिले आहे. मयूर डुमणे असे पत्र लिहिणाऱ्या चाहत्याचं नाव आहे. नक्की काय आहे पत्र जरा वाचाचं.. 

आता कसं वाटतंय.. फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर एकच जल्लोष

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. आता कसं वाटतंय.. गोड गोड वाटतंय.. अशा घोषणा यावेळी नागरिकांनी देत एकप्रकारे निषेध आणि आनंद दोन्ही व्यक्त केला.

शिवसेनेची राष्ट्रवादीशी जवळीक वाढली? राऊत-पवार भेटीतून संकेत

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मी आणि शरद पवार यांनी सोबत बसून देवेंद्र फडणवीस यांचा प्रत्येक शब्द ऐकला, असं यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेबांना दिलेलं वचन – उद्धव ठाकरे

 मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंना दिलेले वचन आहे असे मत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेसोबत काही बोलणेच झाले नाही असे म्हणल्यानंतर ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत फडणवीस घोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. … Read more

मला खोटं पाडल्याबद्दल फडणवीसांचं आभार; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

शिवसेनाप्रमुखांना मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसैनिक बसवेनच असं वचन दिलं होतं. आता ते वचन पाळण्याची जबाबदारी माझी आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी माझी भूमिका ऐकली होती आणि त्यावर त्या दोघांचं एकमत होत नव्हतं. स्वतःला पक्षात अडचण येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मलाच खोटं ठरवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असंही ठाकरे पुढे म्हणाले. पद आणि जबाबदऱ्यांचं सम-समान वाटप हे ठरलं होतं, आणि आता हेच ते नाकारत असतील तर मी काय बोलणार असं म्हणत गोड बोलून आम्हाला नेहमी फरफटायला लावणाऱ्या भाजपचा खरा चेहरा आज उघडकीस आला असल्याची खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.

उद्धव ठाकरेंनी माझे फोनच घेतले नाहीत; त्यांचे नेते मात्र खालच्या पातळीवरचे आरोप करतच राहिले

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.

शिवसेनेला आमच्याशी चर्चा नकोच होती; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ४ वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोषयारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला. महाराष्ट्राच्या जनतेने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. सोबत काम केलेल्या मंत्रिमंडळाचेही त्यांनी आभार मानले. शिवसेना सोबत होती असं तुम्हाला वाटलं तर त्यांचंही आभार अशी कोपरखळी फडणवीसांनी यावेळी लगावली. यावेळी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करणंही फडणवीसांनी टाळलं.

मी पुन्हा येईल म्हणणार्‍या फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. ‍‌१३ व्या विधानसभेचा कार्यकाळ आज ८ नोव्हेंबर रोजी संपत असल्यामुळे फडणवीस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and other state ministers meet Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. pic.twitter.com/grmCMrHLg9 — ANI (@ANI) November … Read more

महायुतीचंच सरकार येणार – देवेंद्र फडणवीस

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेचे निकाल हाती आले असून महायुतीला १६० जागांवर विजय मिळवणं शक्य झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नाला लोकसभेच्या जागावाटपाचा दाखला देऊन ‘फिफ्टी-फिफ्टी’ परिस्थिती राहणार असल्याचं तसेच आता समजून घ्यायची वेळ भाजपची असं सांगितल्यानंतर तोच कित्ता देवेंद्र फडणवीसांनी पुढे नेला आहे. दोन्ही पक्षांच्या मिळून काही अपेक्षा आहेत. आम्ही एकत्र बसून त्यावर निर्णय घेऊ असं सांगत मुख्यमंत्रीपदाबाबत ‘आमचं ठरलंय’ अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे