१९९० पासून वराळी शिवसेनेचा बालेकिल्ला

हॅलो विधानसभा । सूत गिरण्यांमुळे पूर्वी प्रसिद्ध असलेला वरळी मतदारसंघ आता कॉर्पोरेट हब आणि मॉल्समुळे ओळखला जातो. १९९० ते २००४ या काळात शिवसेनेचे दिवंगत नेते दत्ताजी नलावडे येथील आमदार होते. त्याकाळी वरळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईचा. कदाचित याचमुळे आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्यासाठी या मतदार संघाची निवड केली. २०१९ विधानसभेसाठी वरळी मतदारसंघातून शिवसेनेकडून आदित्य … Read more

भाजपच्या काळात विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागील सरकारच्या काळात उद्योगांसाठी वीजदर जास्त होती. मात्र आपल्या सरकारने विदर्भाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रापेक्षा वीजदर ३ रुपयांनी कमी दिली याचाच परिणाम म्हणून त्यांनी विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती मधील महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.

मी स्वयंपाक करेन, पण अजित पवारांचे पाणी आपल्याला चालेल का? – उद्धव ठाकरे

”जेवणाच्या ताटात पवार खडे का टाकतात ? गरिबांसाठी १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले यात काय वाईट? याच गरिबांसाठी स्वयंपाक करण्याची वेळ माझ्यावर आली तरी करेन. मी स्वयंपाक करेन, पण अजित पवार पाणी देतील ते पाणी आपल्याला चालेल का? असा सवाल उपस्थितांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी शरद पवारांवर सुद्धा हल्लाबोल केला. कोल्हापूर उत्तर शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक,  अरुण दुधवडकर यांच्यासह भाजप आणि सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या जमिनी खाल्ल्या – स्मृती इराणी

”काँग्रेस चे राहुल गांधी म्हणतात त्यांना शेतकऱ्यांची चिंता आहे. मात्र अमेठी मध्ये जाऊन शेतकऱ्यांना विचारा.राहुल गांधींनी तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी खाल्या” अशी घणाघाती टीका केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आणि ‘भाजपा’च्या स्टार प्रचारक स्मृती इराणी यांनी केली आहे. श्रीगोंदा येथे बबनराव पाचपुते यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार सुजय विखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना प्रत्येक तालुक्यात सभा घ्यावी लागणं म्हणजे जनतेत भाजपबद्दल नाराजी आहे- शरद पवार

जनतेची भाजपाबद्दलची नाराजी मुख्यामंत्र्यांना कळाली आहे. त्यामुळं तर त्यांना प्रत्येक तालुक्यात सभा घ्यावी लागत आहे. असा टोला राष्ट्रवादीचे सेर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस लगावला. पवार राहुरी मतदारसंघात प्रचार सभेसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केल.

‘तुबची-बबलेश्वर’चे पाणी देणारच अन्यथा जतमध्ये पाऊल देखील ठेवणार – विश्वजीत कदम

काँग्रेस  ही संकल्पना काँग्रेस उमेदवार विक्रम सावंत यांची असून या योजनेमुळे जतला पाणी मिळणार आहे. जतकरांना जर का हे पाणी मिळाले नाही तर मी जतमध्ये पाऊल देखील ठेवणार नसल्याचा निर्वाळा पलूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजीत कदम यांनी केला. येत्या जानेवारीत आम्ही दोन कारखान्यांचे काम सुरू करणार असल्याचे हे त्यांनी यावेळी सांगितले. ते काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचारार्थ बनाळी, शेगाव व कुंभारी येथील जाहीर सभेत बोलत होते.

जेव्हा शरद पवारांना काॅलर धरुन विधानसभेतून बाहेर काढण्यात आलेलं…

हॅलो विधानसभा | राज्याच्या राजकारणात शरद पवार हे नाव नवीन नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय संस्कारात घडलेले शरद पवार आजही त्याच जोमाने राजकारणात सक्रिय आहेत. आजही वयाच्या ७८ व्या वर्षीही पवार एखाद्या तरुणासारखं संपूर्ण महाराष्ट्र फिरतांना दिसून येत आहेत. त्यामुळे पक्षातील एक एक नेता विरोधी पक्षात जात असतानाही पवारांमध्ये ही जिद्द कोठून … Read more

पंकजा मुंडेंच्या सभेतील गोंधळाचं भाजप कनेक्शन?

पिंपरी चिंचवड प्रतिनिधि | भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे रविवारी पुणे दौर्‍यावर होत्या. यावेळी पिंपरी चिंचवड येथील प्रचार सभेत गोंधळ झाला. पंकजा मुंडेंचे भाषण सुरु असताना नागरीकांमधून काही जणांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड परिसरात मराठवाड्यातून मोठा वर्ग आला अाहे. त्यांनी भाजपलाच मतं द्यावीत यासाठी जगताप यांनी … Read more

२७ पैशांची भिक? मतदानापूर्वी हा मेसेज होतोय बेक्कार व्हायरल 

टीम हॅलो महाराष्ट्र | आगामी विधानसभेसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या मतदानापूर्वी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूपच व्हायरल होत आहे. त्यात लोकांना आपले मत न विकण्याचा महत्त्वाचा संदेश दिला जात आहे. यात एका भिकाऱ्याचे उदाहरण दिले गेले आहे. त्यात तुम्ही भिकाऱ्याला २७ पैशांची भीक देतात का असा प्रश्न उपस्थित … Read more

जेव्हा अजित पवार आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते समोरासमोर येतात

बारामती प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठीचे वातावरण चागलेच तापले आहे. सर्वत्र उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचारासाठी धावाधाव सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बारामतीतही राष्ट्रवादी आणि भाजपकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. बारामतीत अजित पवार यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या कुटुंबियांबरोबरच त्यांचे धाकटे पुत्र जय पवार हे सांभाळत आहेत. वेगवेगळ्या भागात जाऊन जय पवार मतदारांच्या गाठीभेटी घेत … Read more