परभणी जिल्हा बँकेवर आ. वरपुडकर पॅनल चे वर्चस्व

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणुक निकाल आज घोषीत झाला. दोन्ही जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणूकीत काँग्रेसचे आ. सुरेश वरपुडकर यांच्या पॅनेलने 21 पैकी 12 जागेवर संचालक निवडून आणत निवडणुकीत बाजी मारली आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक निकालाची … Read more

महाराष्ट्रात लोकशाही सरकार नसून ठोकशाही सरकार – चंद्रकांत पाटील

सातारा | राज्यात सध्या लोकशाही सरकार नसून ठोकशाही सरकार आहे,अशा कडक शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विद्यमान सरकारवर निशाणा साधला आहे. आज साताऱ्यात राज्यसभा खासदार उदयराजे भोसले यांच्यासोबच चंद्रकांत पाटील यांनी अजिंक्यतारा या किल्ल्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी खास आपल्या शैलीत ठाकरे सरकारवर टीका केली. पाटील पुढे म्हणाले … Read more

ऑगस्ट २०२१ मध्ये भारत सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष असेल – संयुक्त राष्ट्र 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवडला गेलेला भारत ऑगस्ट २०२१ ला १५ शक्तीशाली देशांच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या समितीच्या अध्यक्षपदी काम करेल अशी माहिती समोर आली आहे. परिषदेचे अध्यक्षपद हे सभासद देशांच्या अद्याक्षरावरून असते. अध्यक्षपद दर महिन्याला नव्या राष्ट्राला दिले जाते. संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली असून पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारताचा … Read more

गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीने सांगली भाजपात नाराजी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून चारजणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामध्ये जिल्ह्यातील व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांचा समावेश आहे. विधानपरिषदेसाठी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे आणि निता केळकर, दीपकबाबा शिंदे हे निष्ठावंत इच्छुक होते. यंदा निष्ठावंतांना संधी मिळेल याची खात्री असताना पक्षाकडून तिघांनाही डावलण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात बंड करीत … Read more

मध्यरात्री आलेल्या “त्या” फोनमुळे पृथ्वीराज चव्हाणांचे आयुष्यच बदलून टाकले | वाढदिवस विशेष

हॅलो विधानसभा | पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव एक आदर्श व कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणुन नेहमीच घेतलं जातं. स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री अशी चव्हाण यांची ख्याती आहे. मुख्यमंत्री पदावर असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी कधीच आपल्या जवळच्या लोकांच्या फाईली माणुस आपल्या गटातला आहे म्हणुन सह्या करुन पुढे पाठवण्याचं काम केलं नाही. पदाचा गैरवापर स्वत; केला नाही आणि सहकार्यांनाही करु दिला नाही. यामुळे त्यांची जनसामान्यात आजही एक वेगळी प्रतिमा आहे. त्यांच्याच पक्षातील, मित्र पक्षांतील लोकांनी त्यांच्यावर कुरखोड्या करण्याचा प्रयत्न केला, त्यांना अकार्यक्षम ठरवलं पण तरी चव्हाण यांनी आपल्या निर्णयांतून आपल्या कामाची छाप पाडली. ते कायम काँग्रेसशीच एकनिष्ठ राहीले. आजच्या घडीला ताटातली भाजी बदलावी त्याप्रमाणे पक्ष बदलण्याचं सत्र सुरु असणार्‍या काळात पृथ्वीराज चव्हाणांसारखा सच्चा माणुस कसा काय बरं राजकारणात पडला असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्याचं झालं असं… Prithviraj Chavan Education

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म १७ मार्च १९४७ चा. वडील आनंदराव चव्हाण पंडीत नेहरुंचे सहकारी आणि ११ वर्ष केंद्रात मंत्री. पुढे आई देखील खासदार. मात्र तरुण पृथ्वीराजचं मन काही राजकारणात नव्हतं. त्या काळात चव्हाण यांनी बी.ई. (आॅनर्स) चे शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या केलिफोर्निया विद्यापिठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. आणि अभियंता म्हणुन एका मोठ्या संस्थेत नोकरी सुरु केली. भाषांच्या संगणकीकरणाविषयी चव्हाण यांनी संशोधन केलं. हे सगळं सुरु असताना १९९१ साली एकदिवस मध्यरात्रीच्या २ वाजता त्यांचा फोन खणानला. त्याकाळी काँग्रेस हायकमांडच्या एका फोनने देशाची राजकीय गणितं बदलायची. पृथ्वीराज चव्हाण यांना आलेला फोन दिल्लीवरुनच होता. राजीव गांधी बोलत होते. “पृथ्वीराज आपको कराडसे लोकसभा चुनाव लढना है। अभी जल्द जा कर चुनाव का अर्ज दर्ज करो. आपका प्रचार करणे मै खूद आऊंगा।” असं राजीव गांधींनी तिकडून सांगितलं. राजीव गांधींकडे तेव्हा एक तरुन, तडफदार नेतृत्व म्हणुन पाहिलं जात होतं. त्यांना पृथ्वीराज चव्हाणांसारख्या हुशार, अभ्यासू, आणि जनतेशी आस्था असणार्‍या नेत्यांची फळी बांधायची होती. त्याचसाठी त्यांनी चव्हाण यांची निवड केलेली. Prithviraj Chavan Education

हायकमांडचा फोन आल्यानं पृथ्वीराज चव्हाण पहाटेच पुण्याहून कराडला निघाले. उमेदवारी अर्ज भरण्याचा तो शेवटचा दिवस होता. कसातरी गडबडीत त्यांनी अर्ज भरला. थोडा धोडका प्रचार केला. आणि ते खासदार म्हणुन निवडून आले. पुढे केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांनी जबाबदारीची कामं पाहीली. नंतर २०१० रोजी पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मंध्यरात्री आलेल्या त्या एका फोनमूळे चव्हाण यांचे आयुष्यच बदलून टाकले. एक तरुण उच्चशिक्षित इंजिनिअर खासदार झाला. Prithviraj Chavan Education

सातारा जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

उदयनराजे २ लाख मतांनी पडणार; पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी

उदयनराजे म्हणतात ‘स्टाईल इज स्टाईल’, कमिटमेंट कायम राहणार

पुढील सात दिवस सरकारी कार्यालये राहणार बंद

Coronavirus : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, या’ गाड्या ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण

 

उदयनराजे भोसले, रामदास आठवलेंना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर

दिल्ली | भाजपने राज्यसभेसाठी आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रि.पा.इं. नेते रामसाद आठवले यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्राच्या कोट्यातील सात जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणुक होणार आहे. भाजपकडून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर#hellomaharashtra @Chh_Udayanraje @RamdasAthawale @BJP4Maharashtra pic.twitter.com/eYaxTuTKJa — Hello Maharashtra … Read more

राष्ट्रवादीचा मोहिते पाटील गटाला दणका, ६ जि.प. सदस्यांची पक्षातून हकालपट्टी

सोलापूर प्रतिनिधी | भाजप सोबत जवळीक साधणार्‍या मोहिते पाटील गटाला राष्ट्रवादीने दणका दिला आहे. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीमध्ये भाजपला मतदान करणार्‍या मोहिते पाटील गटातील सहा जि.प. सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहा जि.प. सदस्यांनी भाजपला मतदान केले होते. सदर सहा जि.प. सदस्य हे मोहिते पाटील गटातील … Read more

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भाजप शिवसेना एकत्र; महाविकास आघाडीत फूट

उस्मानाबाद | उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीसाठी सेना भाजप एकत्र येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजप नेते आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने … Read more

महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्येही मुख्यमंत्री ‘धनुष्यबाणाचा’च

झारखंड | झारखंड विधानसभेचा निकाल आज लागला. येथे झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने आघाडी घेतली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. हेमंत सोरेन यांनी लालूप्रसाद यादव आणि कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. तसेच, झारखंडच्या आदिवासी गरीब जनतेने भाजपला नाकरल्याची प्रतिक्रिया सोरेन यांनी दिली आहे. 2019 मध्ये भाजपने … Read more

पंकजा मुंडेंच्या सभेतील गोंधळाचं भाजप कनेक्शन?

पिंपरी चिंचवड प्रतिनिधि | भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे रविवारी पुणे दौर्‍यावर होत्या. यावेळी पिंपरी चिंचवड येथील प्रचार सभेत गोंधळ झाला. पंकजा मुंडेंचे भाषण सुरु असताना नागरीकांमधून काही जणांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड परिसरात मराठवाड्यातून मोठा वर्ग आला अाहे. त्यांनी भाजपलाच मतं द्यावीत यासाठी जगताप यांनी … Read more