संपूर्ण कर्जमाफी सोबत शेतकऱ्यांना हेक्टरी लाख रुपये द्या – राजू शेट्टी

परभणी प्रतिनिधी । राज्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसानंतर झालेल्या प्रचंड नुकसानी नंतर उभे करण्यासाठी संपूर्ण कर्ज माफी आणि हेक्‍टरी लाख रुपयांचे अनुदान देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी परभणी मध्ये केली आहे. परभणी येथे आयोजित मोर्चासाठी शेट्टी गुरुवारी आले असता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी केली आहे. ‘केंद्र सरकारकडून राज्याला सापत्न वागणूक मिळत … Read more

महाराष्ट्राचा ‘बिहार’ करायचा आहे का ? – राजू शेट्टी

स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला आणि गोळीबार झाल्याची घटना काल समोर आली होती. सोमवारी सकाळी साडेपाच वाजता देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांची गाडीही पेटवली.

रविकांत तुपकर परतले ‘स्वगृही’

‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ सोडून ‘रयत क्रांती संघटने’त गेलेल्या रविकांत तुपकर यांनी अवघ्या १९ दिवसात यु टर्न घेत पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घरवापसी केली. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांच्या छातीवर बिल्ला लावून त्यांना पुन्हा प्रवेश दिला. ‘स्वभिमानी संघटने’त असलेल्या अंतर्गत मतभेदातून संघटना सोडल्या’चं रविकांत तुपकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

राजू शेट्टी यांना मोठा धक्का; स्वाभिमानीचा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये

कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान काटे यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे झालेल्या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला.

‘सुरेश खाडेंना पाला पाचोळ्यासारखे मतदार उडवून लावतील’- राजू शेट्टी

‘भाजपच्या आमदारांना सत्तेचा माज आला आहे. विरोधकांना पालापाचोळा व कचरा म्हणणाऱ्या सुरेश खाडेंना मतदारच पालापाचोळ्यासारखे उडवून लावतील. त्यांची सत्तेची मस्तीच मतदारच उतरवतील’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मिरजेतील पत्रकार परिषदेत केली. यावेेळी विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, महेश खराडे, संदीप राजोबा, तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागावाटपात ‘स्वाभिमानी’ला ५ जागा, शिरोळमधून राजू शेट्टी की सावकार मादनाईक?

कोल्हापूर प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळसह राज्यातील पाच जागा मिळाल्या आहेत. यामुळे इच्छुकांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धांदल सुरू झाली आहे. शिरोळ मधून सावकर मादनाईकांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. कार्यकर्त्यांचा दबाव वाढला तर ऐन वेळी स्वाभिमानीचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची … Read more

रविकांत तुपकर यांचा पक्ष ‘प्रदेशाध्यक्ष’ पदाचा राजीनामा

बुलढाणा प्रतिनिधी। अखेर रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर भाजपामध्ये जाणार अशी चर्चा राज्यात बऱ्याच दिवसापासून जोर धरू लागली होती. काल त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे पाठवला. याबाबत विचारना करण्यासाठी रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र पुढील निर्णय … Read more

मग… मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करा – राजू शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘शरद पवार यांच्यावर झालेल्या ईडी च्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल नक्की कारवाई झाली पाहिजे या मताशी मी सहमत आहे. त्यामुळे जसा पवारांवर गुन्हा दाखल झाला तसाच चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे.’ असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी शरद यांच्यावर … Read more

राजू शेट्टी लढवणार विधानसभा ; या मतदारसंघातून लढवणार निवडणूक

कोल्हापूर प्रतिनिधी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष , माजी खासदार राजू शेट्टी विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातून राजू शेट्टी निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांना आघाडीच्या घटक पक्षांनी विनंती देखील केली आहे अशी माहिती समोर येत आहे. काजू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का चंद्रकांत पाटील हे जर … Read more

उदयनराजे कुठेही असतील, त्यांचे स्वागत करतो-छत्रपती संभाजीराजे

सोलापूर प्रतिनिधी | उदयनराजे कुठेही असतील त्यांचे स्वागत करतो, असे प्रतिपादन राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. सोलापूरात एका कार्यक्रमासाठी ते आले होते. विधानसभेच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून राज्यात नेत्यांची जोरदार पक्षांतरे सुरु आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधील अनेक वरीष्ठांनी भाजप व शिवसेनेत प्रवेश केला आहे. अजून कहीजण प्रवेशाच्या वाटेवर आहेत. खासदार उदयनराजेही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार आहेत, अशी चर्चा आहे.

[youtube https://www.youtube.com/watch?v=LTcM4fNV_BU&w=560&h=315]

याबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे यांना विचारले असता ते म्हणाले उयनराजे हे आमचे बंधू आहेत. ते कोठेही असले तरी त्यांचे स्वागत करतो. सध्याच्या पक्षांतराबाबत विचारले असता ते म्हणाले, मला राजकीय काही बोलायचे नाही. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीने काढलेल्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेत उदयनराजे दिसले नाहीत. त्यातच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यंतरी भेट घेतली होती. त्यामुळे उदयनराजे यांच्या पक्षांतराबाबत वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेतली होती. उदयनराजे यांच्या राजकीय भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गड किल्ले भाड्याने देण्याबाबत आपला विरोध असल्याचे सांगत माझी भुमिका मी पेजवर स्पष्ट केली असल्याचे ते म्हणाले.