युतीसाठी शिवसेनेचा नवीन फॉर्म्युला ; भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

मुंबई प्रतिनिधी |  भाजप शिवसेना युतीच्या चर्चा सध्या अशा वळणावर आल्या आहेत कि कधी ही युती तुटू शकते अथवा कधीही युती अंतिम होऊ शकते. शिवसेना कमी पणा घ्यायला तयार नाही आणि भाजप शिवसेनेला अधिकच्या जागा देण्यास तयार नाही अशा स्थितीत युतीचे काय होणार हा यक्ष प्रश्न आहे. शिवसेना भाजप युतीचा शिवसेनेने नवीन फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला … Read more

तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल : प्रकाश आंबेडकर

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे करत आहे. पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे देखील बोलले जाते आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे यांना जर मुख्यमंत्री करायचे असेल तर शिवसेनेने हा मुद्दा रेटून धरला पाहिजे अन्यथा त्यांचा राहुल गांधी होण्यास उशीर लागणार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. … Read more

युती बाबत फडणवीसांना मोदींनी दिल्या या सूचना

मुंबई प्रतिनिधी |  शिवसेना भाजप युती होणार की नाही या बाबत उलट सुलट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांना ज्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे भाजप शिवसेनेचे ताणलेले संबंध चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युती करा तडजोड नाही अशा शब्दात सुनावले आहे. त्यामुळे येत्या काळात युतीचे काय … Read more

‘माझी कर्मभूमीच माझा मतदारसंघ असणार’

जालना प्रतिनिधी | ‘माझी कर्मभूमीच माझा मतदारसंघ असणार’ असल्याचं स्पष्टीकरण युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले. शिवसेनेची जन आशिर्वाद यात्रा जालना जिल्ह्यात आली असता ते बोलते होते. आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार की नाही यावर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. वरळी विधानसभा मतदारसंघ हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असेल अशी घोषणा शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी केली … Read more

आदित्य ठाकरे वरळीमधून विधानसभा लढणार ; शिवसेनेच्या या नेत्याने कार्यकर्त्यांमध्ये केली घोषणा

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना पक्षाचे प्रमुख असणारे ठाकरे कुटूंब निवडणुक लढण्यापासून दूर का राहते असा प्रश्न नेहमीच राजकरणात विचारला जातो. त्या प्रश्नाचे उत्तर शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या रूपाने देणार आहे. कारण आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार आहे आता निश्चितच मानले आहे. या संदर्भात वरळी येथील शिसैनिकांच्या मेळाव्यात घोषणा देखील करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. … Read more

मला नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे – आदित्य ठाकरे

अमरावती प्रतिनिधी |‘लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेनेला, युतीला मते दिली त्यांचे आभार मानण्यासोबतच ज्यांनी मतं दिले नाही, त्यांचे मन जिंकायला आपण आलो आहे’ असे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी अमरावतीत पोहोचलेल्या जनआशिर्वाद म्हटले. शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून विदर्भात सुरू झाला असून आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी रात्री अमरावती शहरात पोहोचली. त्यावेळी विजय … Read more

आदित्य ठाकरेंचे वरातीमागून घोडे ; उद्या करणारा कोल्हापूर सांगली पूरग्रस्त भागाचा दौरा

कोल्हापूर प्रतिनिधी | शिवसेना नेते व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी करिता कोल्हापूर आणि  सांगली दौऱ्यावर येत असून, कोल्हापूर जिल्ह्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी शिवसेना बचाव कार्यापासून मदत कार्यात अग्रेसर असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसहाय्य योजनेतून मदतकार्याचा ओघ सुरु आहे. या अनुषंगाने पाहणी करण्याकरिता आणि … Read more

पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर

ठाणे प्रतिनिधी | २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करण्याचं वचन देणाऱ्या शिवसेनेन पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्त सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील बांधवांसाठी सलग ५ दिवस महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे येथून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात महाआरोग्य शिबीरासाठी … Read more

आदित्य ठाकरे यांच्यासाठी विजय मार्ग प्रशस्त फक्त उमेदवारी करण्याची आवश्यकता

मुंबई प्रतिनिधी | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढणार अशा चर्चा सध्या शिवसेनेच्या गोटात रंगत आहे. आदित्य ठाकरे यांना उमेदवारीसाठी वरळी आणि शिवडी मतदारसंघाची चाचपणी देखील सध्या सुरु आहे. त्या दृष्टीनेच शिवसेनेने सचिन अहिर यांना आपल्यात सामावून घेतले आहे. आदित्य ठाकरे यांनीच त्यांना शिवसेनेत आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आता त्यांच्या शिवसेनेत येण्याचा … Read more

आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प यात्रेत चोरांचीच चलती

नाशिक प्रतिनिधी | आदित्य ठाकरे यांनी पुन्हा सत्ता संपादन करण्यासाठी महाराष्ट्र्भर विजय संकल्प यात्रा आरंभली आहे. या यात्रेत चोरांचीच चलती असल्याचे निदर्शनाला आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिक येथील सत्ता संपादन मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्या भाषणाच्या दरम्यान तल्लीन झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचे मोबाईल आणि रोखड लंपास करण्यात आली. आदित्य ठाकरे यांच्या यात्रेत चोरांची टोळी सक्रिय झाली असल्याचे … Read more