अजित पवारांनी केला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या ‘त्या’ चर्चेचा खुलासा

सोलापूरमधील करमाळ्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एका लग्न सोहळ्यात एकमेकांच्या शेजारी बसले होते. राज्यातील सत्तापेच सुटल्यानंतर या दोघांना पहिल्यांदा एकत्र पाहिलं गेलं. संजयमामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात ह्या दोघांनी हजेरी लावली असता यावेळी दोघांनी बराच वेळ गप्पाही मारल्या. हा संपूर्ण प्रकार कैमरात कैद होऊन त्याला व्हायरल वळण लागलं. त्यांच्या या चर्चेचा विडिओ माध्यमात प्रसारित झाल्यावर या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. पण अखेर अजित पवार यांनीच सर्व उलट-सुलट चर्चांना विराम देत त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं याचा आज बारामतीत माध्यम प्रतिनिधींसमोर खुलासा केला.

अजित पवार,देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र! व्हिडिओ व्हायरल

तब्बल एक महिन्याच्या चाललेल्या सत्तानाट्याला अखेर २८ नोव्हेंबर ला पूर्णविराम मिळाला. ‘महाविकासाआघाडी’ने एकत्र येत राज्यामध्ये सत्ता स्थापन केली. मात्र याच्या काही दिवस आधी सत्ता संघर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करत सर्वांना जोरदार धक्का दिला. मात्र सत्ता स्थापनेचा दावा न करू शकल्याने अल्पकाळात त्यांचे सरकार कोसळले. मात्र सत्तास्थापनेच्या या नाट्यमय घडामोडीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. निम्मित होत माढ्यामधील शाही विवाह सोहळा. या विवाह सोहळ्यात हे दोघेही नेते एकत्र बसून चर्चा करतानाचा व्हिडीओही समोर आला आहे.

आता भाजपातून मेगा एग्जिट…?

निवडणुकीच्या तोंडावर हे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात दाखल झाले होते. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडूनही आले आहेत. परंतु आता ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देत स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.

‘भाजपा’ने राज्यावर तब्बल पावणे ७ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे – नितीन राऊत

तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे २ , राष्ट्रवादीचे २ आणि सेनेच्या २ आमदारांनी देखील शपथ घेतली.

‘देवेंद्र यांच्या नशिबात काय ते सटवीलाच माहित’; शेलारांची खंत

देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी  निवड करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर सत्ताधारी नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

‘या’ खट्याळ ट्विटवरून संजय राऊत यांनी फडवीसांना काढला चिमटा

‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की….’ हा खणखणीत आवाज शिवाजी पार्कच्या आसमंतात घुमला आणि जमलेल्या लाखो लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि गगनभेदी घोषणांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी समारंभ डोळ्यात साठवला. ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला, त्याच ठिकाणी त्यांचे पुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाखोंच्या साक्षीने गुरुवारी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

आम्ही प्रश्न विचारले म्हणूनच फडणवीस सरकार पडले, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या बाबतीत वेगवेगळी मतांतरे पुढं येत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नव्या सरकारबद्दल आपली प्रतिक्रिया एक विडिओ जारी करत दिली आहे. या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा आधार घेत आंबेडकर यांनी एक मोठ विधान केलं. भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा निवडणुकीपूर्वीच झाला होता असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं होत. याबाबत ‘आम्ही वारंवार सरकारला प्रश्न विचारात राहिलो त्यामुळंच फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला’ असा दावा आंबेडकर यांनी दिला.

एकनाथ खडसे यांनी केला फडणवीस यांच्यावर शाब्दिक वार..

शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यान मुख्यमंत्री होणार असल्याचं निश्चित झालं आणि देवेंद्र फडणवीस यांना आपल्या औटघटकेच्या मुख्यमंत्रीपदाचा अखेर राजीनामा द्यावा लागला. ज्या अजित पवार यांच्या पाठिंब्याने फडणवीस रातोरात मुख्यमंत्री बनले होते. त्या अजित पवार याना आपल्यामागे कोणी नाही याची जाणीव झाली आणि अखेर नामूशकीतून त्यांनी राजीनामा दिला. मात्र, त्यामुळं मी पुन्हा येईन असा आत्मविश्वास असणाऱ्या फडणवीस यांचा पुन्हा हिरमोड झाला. आधी विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानं त्यांच्या नैतृत्वावर पक्षात दबक्या आवाजात टीका होती. परंतु, फडणवीस यांच्या वागणुकीतून दुखावलेले अनेकजण आता फडणवीस यांच्या नाचक्कीनंतर खुलेआम आता त्यांच्यावर शरसंधान साधत आहेत.

पलट के आऊंगी, मौसम जरा बदलने दो – अमृता फडणवीस

मुंबई | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक हटके फोटो शेअर केला आहे. पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर, खिजा की जद में हूँ मौसम जरा बदलने दो! असं कॅप्शम अमृता फडणवीस यांनी दिले आहे. मिस फडणवीस यांच्या … Read more

अजित पवारांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला – गिरिश बापट

शनिवारी सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . या राजकीय पालटवारने महाराष्ट्रात एकच खळबळ माजवली . भाजपने सत्ता स्थापन केल्या नंतर पुण्यातखासदार गिरीश बापट आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भारावून जल्लोष साजरा केला .