मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळालं- राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई । राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन ६ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, सरकारमधील सहभागीदार असलेला काँग्रेस पक्ष नाराज असल्याची वृत्त समोर आलं होत. यानंतर सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळावं अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. यावरून भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. … Read more

मुख्यमंत्र्यांना भेटून काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर; म्हणाले..

मुंबई । महाविकास आघाडीमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्री ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. ‘राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमची कोणतीही नाराजी नव्हती. महाविकासआघाडी भक्कम आहे आणि ५ वर्ष चांगलं काम … Read more

नाराज काँग्रेसची समजूत काढण्यासाठी शिवसेनेनं धाडले ‘दूत’; अनिल देसाई बाळासाहेब थोरातांच्या भेटीला

मुंबई । महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय प्रकियेत स्थान मिळत नसल्याची उघड नाराजी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटण्यासाठी वेळही मागितली, मात्र, गेल्या सोमवारी होणारी ही भेट अजून झालेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या नियोजित भेटी आधी शिवसेना नेते   अनिल देसाई यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. काँग्रेसचं गाऱ्हाणं … Read more

.. तर राज्य सरकारचा पाठिंबा काढावा! रामदास आठवलेंचा काळजीपोटी काँग्रेसला सल्ला

मुंबई । काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. मात्र निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घेतले जात नाही. तसं असेल तर काँग्रेसनं राज्य सरकारचा पाठिंबा काढावा,’ असा सल्ला रिपब्लिकन नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला दिला आहे. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावर … Read more

काँग्रेसचे नाराज मंत्री सोमवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

मुंबई । महाविकास आघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची गुरुवारी मुंबईमध्ये बैठक झाली होती. या बैठकीनंतर महाविकासआघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान देण्यात यावं, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली होती. मात्र, आता काँग्रेस नेते त्यांची तक्रार घेऊन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायला जाणार आहेत. शुक्रवारी रात्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. यावेळी … Read more

सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान द्या! काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांची आज मुंबईमध्ये बैठक पार पडली. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर ‘काही प्रश्न नक्कीच आहेत. सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला … Read more

महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसची खदखद? बोलावली महत्त्वाची बैठक

मुंबई । महाविकासआघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं बोललं जात आहे. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याच्या नाराजीतून काँग्रेसच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत सरकारमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक होत आहे. राज्यातील सध्याच्या … Read more

‘आमच्या सर्कशीत प्राणी आहेत, फक्त एक विदुषक हवाय’; पवारांचा राजनाथ सिंहांना दे धक्का!

मुंबई । राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख सर्कस म्हणून करणाऱ्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच सडेतोड उत्तर दिलं आहे. आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, मात्र एका विदुषकाची कमतरता आहे, या शब्दांत त्यांनी राजनाथ सिंहांचा खरपुस समाराच घेतला तोही अगदी आपल्याच शैलीत. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसललेल्या कोकणातील वादळग्रस्त … Read more

राज ठाकरेंच्या ‘त्या’ प्रश्नाचं सरकारकडे तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही

मुंबई । लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शहरांत होत असलेली गर्दी व गोंधळाला राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार जबाबदार असल्याची टीका मनसेनं केली आहे. ‘पुनश्च हरिओम’ म्हणत राज्यातील ठाकरे सरकारनं लॉकडाऊनमधून हळूहळू बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३ जून, ५ जून आणि ८ जून अशा तीन टप्प्यांत एकेका गोष्टीवरचे निर्बंध सरकारनं उठवले आहेत. … Read more

कोरोनाच्या संकटात डॉक्टरांना प्रोत्साहन; ठाकरे सरकारने केली मानधनात वाढ

मुंबई । कोरोनाच्या लढ्यात सर्वात आघाडीवर लढणाऱ्या डॉक्टरांच्या कामाची दखल घेत राज्य सरकारनं त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचसोबत बॉण्डेड डॉक्टर आणि कंत्राटी डॉक्टर यांचे मानधनही समान केले जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. डॉक्टरांच्या मानधनात वाढ केल्यामुळे कोरोना … Read more