काँग्रेसच्या दिलीप सानंदांची निवडणुकीतून माघार; ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत घेतला निर्णय

बुलडाणा प्रतिनिधी। बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सानंदा यांच्या निवडणूक न लढवण्यामागे एक वेगळेच असल्याचे कारण समोर येत आहे. ईव्हीएमने घेतल्या जाणाऱ्या मतदानावर संशय असल्याचे कारण पुढे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. ईव्हीएमच्या मुद्यावर निवडणुकीतूनच माघार घेण्याची भूमिका घेणारे … Read more

वादग्रस्त भाजपा आमदार राजु तोडसाम यांचा ‘पत्ता कट’  

यवतमाळ प्रतिनिधी। यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आर्णी – केळापूर विधानसभेचे भाजपाचे विद्यमान आमदार राजु तोडसाम यांचा विधानसभेसाठी पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपाची पहिली १२५ उमेदवारांची यादी आज जाहीर झाली आहे. या यादीत तोडसाम यांच्या जागी आता भाजपाचे माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांची विधानसभेसाठी वर्णी लागली आहे. आमदार तोडसाम यांची कारकीर्द वादग्रस्त राहिल्यामुळे … Read more

शिराळा विधानसभा मतदारसंघ लढवणारच- सम्राट महाडिक

सांगली प्रतिनिधी। शिराळा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे. तिकीट मिळाल तर ठिक अन्यथा अपक्ष निवडणूक लढवणारच आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदा माघार नाही. असा इशारा सम्राट महाडीक यांनी दिला. कासेगाव येथे वनश्री नानासाहेब महाडिक प्रेमींनी आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्याप्रसंगी सम्राट महाडीक बोलत होते. वाळवा तालुक्यातील ४८ गावातील नानासाहेब महाडीक प्रेमींचा प्रचंड मोठा जनसागर … Read more

पडळकरांनी वंचितची साथ सोडल्याने होणार मोठे परिणाम

सांगली प्रतिनिधी। धनगर समाजाच्या आरक्षणावरुन राज्यभर प्रचाराची राळ उठवून अल्पावधीत प्रसिध्द झालेले नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदार संघात त्यांनी वंचित घटकांचे जोरदार संघटन करुन तीन लाखांहून अधिक मते खेचली होती मात्र. आता त्यांनी … Read more

‘शेतकरी संघटना’ २८८ जागा लढवणार- रघुनाथ दादा पाटील

सातारा प्रतिनिधी। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी आपआपल्या रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘शेतकरी संघटने’चे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी देखील शेतकरी संघटना पक्षाची विधानसभेसाठी आपली भूमिका मांडली आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व २८८ जागा लढवणार लढवणार असल्याची महत्व पूर्ण माहिती त्यांनी आज दिली. कराड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये … Read more

कोण मारणार ‘वणी विधानसभा’ क्षेत्रात बाजी; निवडणूक स्पेशल

यवतमाळ प्रतिनिधी । स्पेशल स्टोरी यवतमाळ पासून 107 किमी दूर असलेले जिल्ह्याचे शेवटच्या टोकाचे विधानसभा क्षेत्र म्हणजे वणी. वणी शहराला “ब्लॅक डायमंड सिटी” नावाने ओळखल जातं, कारण या क्षेत्रात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. वणी, मारेगाव, झरी असे तीन तालुके या विधानसभेच्या क्षेत्रात येतात. आता निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत. प्रत्येक जण … Read more

चंद्रकांत पाटलांची निवडणुकी करिता कागदांची जुळवाजुळव सुरू ?

कोल्हापूर प्रतिनिधी। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘निवडणूक लढवा’ असा आदेश दिल्यानंतर धावपळ नको म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ती आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार असल्याने आणि राज्यभर प्रवास करावा लागणार असल्याने स्वत: पाटील निवडणूक लढविण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याचे समजत आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी लढावे, अशी तेथील भाजपा … Read more

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचा वंचितच्या सर्व पदांचा राजीनामा

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे गेल्या दोन महिन्यांपासून अज्ञातवासात गेलेल्या गोपीचंद पडळकर यांनी अखेर वंचित बहुजन आघाडी मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज सांगली मध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तसेच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे निष्कलंक आणि चारित्र्यवान नेते असल्याचंही जाता जाता त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या राजीनाम्यामुळे … Read more

भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडू – विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर

सांगली प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. आचारसंहिता भंग केल्यास तात्काळ कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला. पारदर्शी, भयमुक्त वातावरणात निवडणूका पाडण्यात येईल, तसेच दिव्यांग मतदारांच्या सोयीसुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करण्यात येवू नये, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर … Read more

सांगली जिल्ह्यात भाजप-सेना युतीच्या संभ्रमाने वाढली चिंता

सांगली प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीचे घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे, जिल्ह्यात स्वबळावर लढण्याची भाजप आणि शिवसेनेकडून तयारी सुरु आहे. मात्र युती झाल्यास सेनेने जिल्ह्यातील विधानसभेच्या वाट्याच्या चारही जागा ताकदीने लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इस्लामपूर, पलूस-कडेगाव आणि तासगाव-कवठेमहांकाळ या तिन्ही विधानसभेच्या जागा भाजपने लढविण्याचा निर्धार करीत रणनिती … Read more