शेतकरी आत्महत्येला शेतकरीच जबाबदार- प्रकाश आंबेडकर

यवतमाळ प्रतिनिधी। शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी शेतकरीच जबाबदार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी विवादास्पद वक्तव्य केलं आहे. यवतमाळ इथं बोलतांना त्यांनी ही मुक्ताफळं उधळली. शेतकरी जात पाहून मतदान करतो. त्यामुळं शेतकऱ्याची ही अवस्था आहे. वंचित बहुजन आघाडीला मतदान केल्यास कापसाला हमी भावाप्रमाणे पैसे मिळतील. तर जात पाहून मतदान केल्यास 3500 रु प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळणार. असं म्हणून … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर परिणाम करणारी बातमी ; एमआयएम , वंचितच्या तलाकनाम्यावर ओवेसींची सही

मुंबई प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने घेतला आहे. यासंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढून घोषणा केली होती. मात्र यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी ओवेसी जोपर्यंत युती तोडण्याच्या निर्णयावर काही बोलत नाहीत तोपर्यंत कोणत्याही वावड्या खऱ्या मानू नका असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. मात्र आज ओवेसींनी देखील हात वर केले आहेत. त्यामुळे … Read more

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

सोलापूर प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडी भाजप  आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मदत करत असल्याचा आरोप करून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वातील वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण माने वंचितमधून बाहेर पडले होते. मात्र, आता त्यांनी शिवसेना आणि आपले काही वावडे नसल्याचं म्हणले आहे तसेच ते शिवसेनेला मदत करणार असल्याचे बोलले आहे.

लक्ष्मण माने म्हणाले, “प्रबोधनकार ठाकरे हे आमच्या चळवळीचे नेते आणि माझे गुरु होते. त्यांचा मुलगा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चूक केली. मात्र, नातवंडे सुधारत असतील तर त्यांना मदत करण्याची माझी तयारी आहे.” म्हणजेच आगामी विधानसभा निवडणुकीत ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा साथ देणार असं म्हणत आहेत.

माने यांनी सोमवारी (9 सप्टेंबर) सोलापुरात पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला मदत करणार असल्याचे म्हणाले.
[youtube https://www.youtube.com/watch?v=9TZnNiR7oFQ&w=560&h=315]

प्रकाश आंबेडकरांना आरएसएसची फूस : खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद प्रतिनिधी |  लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात मते आपल्याकडे वळविली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीला सुवर्ण संधी चालून आलेली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष संपल्यात जमा आहेत. अशावेळी एमआयएमला आठ जागा देऊ असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आम्हाला का झुलवत ठेवत आहेत? हे कळायला … Read more

काँग्रेस सोबत निवडणूक लढवायची की नाही या बाबत प्रकाश आंबेडकरांनी केले अंतिम विधान

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धूळ चारत मोठी ताकद म्हणून समोर आलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू होती. मात्र, आज त्यावर पूर्णविराम लागला. आंबेडकर … Read more

म्हणून सरकारने गडकोट विक्रीला काढले : प्रकाश आंबेडकर

नागपूर प्रतिनिधी |  राज्य सरकारच्या गडकोट भाड्याने देण्याच्या निर्णयाचा विरोधक आणि सोशल मिडीयाने देखील निषेद केला आहे. त्याच मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी देखील तोंडसुख घेतले आहे. त्यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका करताना सरकारला दारुड्याची उपमा दिली आहे. ‘या सरकारची संपूर्ण तिजोरी खाली झाली आहे. एखाद्या दारुड्याप्रमाणे यांची अवस्था झाली आहे. म्हणून आता … Read more

एमआयएमच्या युती तोडण्याच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर म्हणतात

नागपूर प्रतिनिधी |  वंचित बहुजन आघाडीत फूट पडली असून एमआयएम वंचित मधून बाहेर पडली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढून या संदर्भात घोषणा केली आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएम प्रमुख असुद्दीन ओवेसी यांची मी हैद्राबाद येथे जाऊन भेट घेतली आहे. तसेच हैद्राबाद वरून काही प्रतिनिधी येऊन मला … Read more

रमाई घरकुल योजनेबाबत ‘वंचित’ आक्रमक

अकोला प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यातील  महानगरपालिका, आणि इतर सहा नगरपालिकांमध्ये रमाई घरकुल योजना मागील दोन वर्षापासून रेंगाळत पडली आहे. अकोला जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना ही व्यवस्थित राबविली जात आहे, परंतु रमाई घरकुल योजनेसाठी जिल्हा समाज कल्याण विभागातून निधीच मंजूर केला जात नाही. त्या करीता नगरपालिका आणि महानगरपालिका स्तरावरून प्रस्ताव नसल्याचे तोंडी सांगितले जात आहे. परंतु अनुसूचित … Read more

वंचितचा विरोधी पक्षनेता नाही, मुख्यमंत्री असेल – प्रकाश आंबडेकर

वृत्तसंस्था | विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता नाही तर मुख्यमंत्री असेल असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. एवढंच नाही तर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबाबत भाष्य केलं आहे. वंचित बहुजन आघाडी जोपर्यंत आपली व्यूहरचना जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही दिलेली १४४ जागांची ऑफर घेऊन चर्चेसाठीची … Read more

पक्षांतराबद्दल गोपीचंद पडळकर म्हणतात

सांगली प्रतिनिधी | मागील क्काही दिवसापासऊन गोपीचंद पडळकर हे शेतकरी कामगार पक्षात जाऊन सांगोला विधानसभेची निवडणूक लढणार अशी चर्चा सुरु होती. त्यावर त्यांनी आज भाष्य केले आहे. मी वंचितचाच आहे. वंचितमध्येच राहणार. आम्ही वंचित समाजासाठी लढा सुरु केला आहे. तो लढा असाच सुरु ठेवणार आहे. त्याच प्रमाणे प्रकाश आंबेडकरांची साथ कधीच सोडणार नाही असे गोपीचंद पडळकर … Read more