महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात अल्प प्रतिसाद, अनेक ठिकाणी दैनंदिन कामकाज सुरुच

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापुरात अल्प प्रतिसाद मिळला.

बंदला परभणी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद; CAAच्या विरोधात सर्वत्र निदर्शनं

वंचित बहुजन आघाडी व परिवर्तनवादी संघानेच्या वतीने, आज NRC आणि CAA ला विरोध करत पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला परभणी जिल्ह्यातही संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील काही भागात बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालूक्यांमध्ये बंदमुळे जनजीवन विस्कळीत आहे. आरोग्य सेवा वगळता सर्वच दुकाने यावेळी सकाळपासूनच बंद आहेत. रस्त्यावरही दुपारपर्यंत शुकशुकाट दिसत आहे.

सरकारच्या दमनशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे – शरद पवार

मुंबई । जेएनयूमध्ये जे घडले ते योग्य नव्हते, म्हणून त्याचा सर्वत्र विरोध होत आहे. लोक सरकारवर संतप्त आहेत म्हणून देशात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. सरकारी दडपशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई येथे आज शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आदी … Read more

शरद पवारांच्या संमतीशिवाय सरकार बनलं हे पवारांना सिद्ध करावं लागेल – आंबेडकर

मुंबई प्रतिनिधी | अजित पवार यांनी आज भाजपशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

लोकांनी माझे एकले असते तर आजचा सुखद धक्का त्यांना बसला नसता असं म्हणत प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलीय. तसेच शरद पवार हे खरोखर पुरोगामी आहेत काय हे आता त्यांना सिद्ध करावं लागेल. आज बनलेलं सरकार हे शरद पवारांच्या संमतीशिवाय बनले आहे हे शरद पवारांना सिद्ध करावं लागेल असंही आंबेडकर यावेळी म्हणालेत.

दरम्यान तीन दिवसांपूर्वीच शिवसेनेचा पोपट होऊ शकतो असं मी म्हणालो होतो. आज उल्लू कोण कोण बनलं असं तुम्ही विचाराल तर काँग्रेस आणि शिवसेना हे उल्लू बनले आहेत असं आंबेडकर यांनी सांगितले.

शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला नाही हे सिद्ध केलं पाहिजे - प्रकाश आंबेडकर

इतर महत्वाच्या बातम्या –

“या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल”- प्रकाश आंबेडकर

“या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल”, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी घनसांगवीत बोलतांना केला. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे घनसावंगी मतदारसंघाचे उमेदवार विष्णू शेळके यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची जालना जिल्ह्यातील घनसावंगी मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

मला एकदा पकडूनच दाखवा, प्रकाश आंबेडकरांच सरकारला खुले आव्हान

उस्मानाबाद प्रतिनिधी | अजित माळी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची आज कळंब येथे उस्मानाबाद मतदारसंघाचे उमेदवार धनंजय शिंगाडे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. हे सरकार त्यांच्या विरोधात बोलनाऱ्यावर कारवाई करत आहे. जो विरोधात बोलतोय त्यांच्यावर देशद्रोहाची कारवाई करतायेत. मी सरकारला आव्हान करतो मला एकदा पकडूनच … Read more

‘काँग्रेस हे भुरटे चोर तर भाजपवाले डाकू आहेत’- प्रकाश आंबेडकर

“काँग्रेस म्हणजे भुरटे चोर होते, तर भाजपवाले डाकू आहेत”, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. आंबेडकर चंद्रपूरमधील बल्लारपुरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते. “आम्हाला भाजपची बी टीम म्हणणारे काँग्रेस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याशी चर्चेची वाट बघत होते,” असा धक्कादायक खुलासाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

वंचितच्या उमेदवाराचा ‘वचननामा’, चर्चा मात्र संपूर्ण राज्यभर

राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला हळूहळू जोर चढला असून राज्यातील प्रमुख पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे, वचकनामे आणि शपथनामे जाहीर करायला सुरुवात केली आहे. मात्र, राज्यात सध्या खमंग चर्चा आहे ती वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार किरण काळे यांच्या वैयक्तिक वचननाम्याची.

वंचित उमेदवाराचा एसटीत ‘चालता बोलता’ प्रचार

जिल्ह्यातील जिंतूर व सेलु मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनोहर वाकळे यांनी आज येलदरी ते जिंतूर पर्यंत चक्क बसने प्रवास करत चालता बोलता प्रचार केला. प्रवासादरम्यान वाकळे यांनी बस मधील प्रवाश्यांच्या समस्या जाणून घेत ,येणाऱ्या काळात आपण ह्या सर्व अडी अडचणी दूर करु असे आश्वासन दिले .त्याच बरोबर माध्यमांशी बोलतांना ,रस्त्याचे प्रश्न फार गंभीर झाले असून यावर तोडगा काढण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, त्याचबरोबर मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची १९ वर्षांची नौकरी सोडून, समाजसेवेसाठी आपण पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

जालन्यात प्रकाश आंबेडकरांच्या अटकेचे पडसाद, ‘वंचितसेना’ रस्त्यावर

आरे येथील जंगलतोडी विरोधात रस्त्यावर उतरलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ आज जालन्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने करण्यात आली.