बीड मधील लढतींचे चित्र स्पष्ट, महायुती मधील गेवराईची बंडखोरी वगळता ‘बंड थंड’

गेवराई वगळता बीड जिल्ह्यात ‘महायुती’मधील सर्व बंडखोर नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे बीड मधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांनी आपली तलवार म्यान केल्यामुळे पाच मतदार संघात दुरंगी लढत होणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. तर गेवराई मतदारसंघात शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. या मतदारसंघात भाजप – राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होईल

महाराष्ट्रात शत्रुघ्न सिन्हा करणार विरोधकांना ‘खामोश’

एकेकाळी भाजपची स्टार शॉटगन असणारे शत्रुघ्न सिन्हा आता काँग्रेसच्या बाजूने विरोधकांना खामोश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक प्रचाराच्या राजकीय शिमग्यात विरोधाकांना प्रचारात नामोहरम करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हांच्या रूपाने काँग्रेसला त्याच्यासाठी नवा चेहरा मिळाला आहे.

पुण्यात दसऱ्यानंतर धडाडणार ‘ठाकरी’ तोफा; उद्धव, राज यांच्या एकाच दिवशी सभा

राज ठाकरे यांची ९ ऑक्टोबरला पुण्यात टिळक चौकात (अलका चौक) तर त्याच वेळी उद्धव ठाकरे यांची पिंपरीत संध्याकाळी ७ वाजता सभा होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं असताना हे दोन ठाकरे बंधू आपल्या सभांमधून कुणाला लक्ष्य करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

शिवसेनेकडून पालघरमध्ये सोशल इंजिनिअरींग; आदिवासी, वंचित घटकांना प्राधान्य

पालघर प्रतिनिधी। पालघर विधानसभेसाठी शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन सोशल इंजिनिअरिंगचा खेळ खेळला आहे. आदिवासीबहुल पट्टा म्हणून पालघरची ओळख आहे. अशा परिसरात आदिवासी घटकाला उमेदवारी देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः दिलेला शब्द पाळला आहे. आदिवासी समुदायाचा मोठा ताफा सोबत बाळगत वनगा यांनी काल गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. आदिवासी पारंपरिक नृत्य करत … Read more

निवडणूक आयोगाने लोकप्रिय ‘लुडो’ चिन्हाचा समावेश करत विधानसभेसाठी 197 चिन्ह दिली

मुंबई प्रतिनिधी। निवडणुकांचा प्रचार खऱ्या अर्थाने निवडणुकीतील चिन्हांमुळे रंगात येतो. राजकीय पक्षाच्या उमेदवारांची चिन्हे आधीच निश्‍चित असतात. पण, अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी चिन्हाचे वाटप होते. त्यामुळे त्यांना कमीत कमी कालावधीत आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे कठीण काम यशस्वीपणे करावे लागते. त्यामुळे रोजच्या वापरातील आणखी ओळखीच्या चिन्हाला अपक्ष उमेदवारांची मागणी असते. त्यामुळे यंदा निवडणूक आयोगाने … Read more

‘शेतकरी संघटना’ २८८ जागा लढवणार- रघुनाथ दादा पाटील

सातारा प्रतिनिधी। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी आपआपल्या रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘शेतकरी संघटने’चे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी देखील शेतकरी संघटना पक्षाची विधानसभेसाठी आपली भूमिका मांडली आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व २८८ जागा लढवणार लढवणार असल्याची महत्व पूर्ण माहिती त्यांनी आज दिली. कराड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये … Read more

परभणीत जिल्ह्यात नऊ गावांचा मतदानावर बहिष्कार

परभणी प्रतिनिधी। गजानन घुंबरे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून ऑक्टोबर महिन्यांमधील 21 तारखेला संपूर्ण राज्यांमध्ये एकाच दिवशी मतदान होणार आहे. पण मागील पंचवार्षिक मध्ये गावागावात जाऊन पाच वर्षात गाव व तालुक्‍याचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्याचे आश्वासन नेतेमंडळींनी दिले होते. सदरील आश्वासने हवेतच विरले गेल्याने , पाच वर्षानंतर विकासापासून दूर राहिल्याची भावना निर्माण झाल्याने जिल्ह्यातील … Read more

चंद्रकांत पाटलांची निवडणुकी करिता कागदांची जुळवाजुळव सुरू ?

कोल्हापूर प्रतिनिधी। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘निवडणूक लढवा’ असा आदेश दिल्यानंतर धावपळ नको म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ती आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार असल्याने आणि राज्यभर प्रवास करावा लागणार असल्याने स्वत: पाटील निवडणूक लढविण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याचे समजत आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी लढावे, अशी तेथील भाजपा … Read more

सांगली जिल्ह्यात भाजप-सेना युतीच्या संभ्रमाने वाढली चिंता

सांगली प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीचे घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे, जिल्ह्यात स्वबळावर लढण्याची भाजप आणि शिवसेनेकडून तयारी सुरु आहे. मात्र युती झाल्यास सेनेने जिल्ह्यातील विधानसभेच्या वाट्याच्या चारही जागा ताकदीने लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इस्लामपूर, पलूस-कडेगाव आणि तासगाव-कवठेमहांकाळ या तिन्ही विधानसभेच्या जागा भाजपने लढविण्याचा निर्धार करीत रणनिती … Read more

ईव्हीएम बंद झाल्याशिवाय परिवर्तन नाही- वामन मेश्राम

नाशिक प्रतिनिधी| ‘देश अराजकतेच्या दिशेने चालला आहे. लोकशाही पर्यायाने संविधान बदलवून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. भारतीय जनता पार्टीन 2014 व 2019 च्या दोनही निवडणुका ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून जिंकल्यात. यात देशातील निवडणूक आयोगही सहभागी असून सुप्रीम कोर्टान दिलेला निर्णय ही पाळत नाही. तेव्हा देशात हुकुमत कुणाची हे लक्षात आल पाहिजे. म्हणूनच ईव्हीएम बंद झाल्याशिवाय देशात परिवर्तन … Read more