मग… मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करा – राजू शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘शरद पवार यांच्यावर झालेल्या ईडी च्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल नक्की कारवाई झाली पाहिजे या मताशी मी सहमत आहे. त्यामुळे जसा पवारांवर गुन्हा दाखल झाला तसाच चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे.’ असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी शरद यांच्यावर … Read more

राजू शेट्टींना दणका : स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर करणार भाजपात प्रवेश

मुंबई प्रतिनिधी |  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राजू शेट्टी यांचे निकटवर्तीय रविकांत तुपकर भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात तुपकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे देखील बोलले जाते आहे. शेतकरी कुटुंबातून आलेले रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तरुण चेहरा होते. त्याच प्रमाणे त्यांचा … Read more

मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांना हवी असणारी माहिती देणार : शरद पवार

मुंबई प्रतिनिधी |  राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात त्यांनी आज मुंबई मध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आपली भूमिका विस्ताराने मांडली आहे. मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांना हवी असणारी माहिती देणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मी राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे. महिनाभर मुंबईत … Read more

युती बाबत मुख्यमंत्री म्हणतात

मुंबई प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून पुढील महिन्यात होणारी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री होणार असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजप 162 आणि शिवसेना 126 जागावर निवडणूक लढणार असल्याच्या वृत्तांचे मात्र त्यांनी फेटाळून लावले. दोन्ही पक्ष आघाडी करून निवडणूक लढणार … Read more

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खिंडार पाडत बसलेल्या भाजपचे विदर्भातील नेते पक्ष सोडण्याच्या नादात

नागपूर प्रतिनिधी | भाजप अजिंक्य असल्याच्या सध्या अविर्भावात आहे. त्यांच्या या आत्मविश्वासाला भुलून विरोधी पक्षातील भल्याभल्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून भाजपमध्ये प्रवेश केला.परंतू असे असले तरी विदर्भातील भाजप नेत्यांना याचीच धास्ती बसलेली दिसत आहे. विदर्भात भाजपमधील इच्छूकांची गर्दी पाहता, उमेदवारीची खात्री नसल्याने ऐनवेळी निराशा नको म्हणून भाजपच्या काही नेत्यांनी अन्य पक्षांकडे गळ टाकून ठेवला असल्याची माहिती … Read more

अखेर युतीचं ठरलं ! उद्धव ठाकरेंनी देखील दिला या फॉर्म्युल्याला ग्रीन सिग्नल

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप युतीच्या फॉर्म्युल्यावर अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र सर्व तर्क वितर्क आता निकाली निघाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यात झालेल्या चर्चेत युतीचा फॉर्म्युला पक्का केला आहे. तो फॉर्म्युला घेऊन सुभाष देसाई मातोश्रीवर गेले असता उद्धव ठाकरे यांनी देखील त्या फॉर्म्युल्याला ग्रीन सिंग्नल दिला आहे. … Read more

वारं फिरणारं ! काँग्रेस देणार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तगडा उमेदवार

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस पक्षाच्या लागलेल्या गळतीला उपाय म्हणून काँग्रेसच्या नेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचा निर्धार केला आहे. २५ सप्टेंबर रोजी प्रियांका गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या दौऱ्यावर आल्यावर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेचे देवेंद्र फडणवीस हे १९९९ पासून प्रतिनिधित्व करत आहेत. … Read more

महाजनादेश यात्रा : नरेंद्र मोदींनी केला कलम ३७० हटवल्याचा उदो उदो

नाशिक प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेच्या सांगता करण्यासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हटवल्याचा उदो उदो केला आहे. रक्ताने रंजीत झालेल्या कश्मीरला आपण आता तयार करायाचे आहे. आम्ही आमच्या सरकारच्या १०० दिवसांचा चमत्कार दाखवला आहे अशा शब्दात नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय मुद्दयांवरच भाषण दिले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे नरेंद्र मोदींनी … Read more

नाशिक मोदींच्या सभेत गडबड होऊ नये म्हणून पोलीस दक्ष

नाशिक प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. पण अनेकजण सध्या सरकार विरुद्ध आंदोलन करत आहेत. त्यामुळं सरकारविरुद्ध आंदोलन  करणाऱ्यांचा पोलिसांनी धसका घेतलाय. मोदींच्या सभेच्या वेळी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून पोलिसांनी कसली कंबर कसलीये. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्या … Read more

महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘जागतिक बँक व आशियाई डेव्हलपमेंट बँक यांच्या सहकार्याने पूरस्थितीवर शाश्वत उपाययोजना केली जाणार आहे. त्यामुळे महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल आणि महापुराचा कसल्याेही प्रकारचा फटका बसणार नाही. याच वेळी वीज, रस्ते , पाणी या मूलभूत सुविधा अव्याहतपणे कार्यरत राहणारे नियोजन केले जाणार आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी … Read more