शेतकऱ्यांनसाठी खूषखबर! कर्जफेडीसाठी मिळाला आगस्टपर्यंतचा वाढीव कालावधी 

वृत्तसंस्था। केंद्रात दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे. या बैठकीत शेती व शेतीशी संबंधित उद्योगांच्या ३ लाखांपर्यंतच्या कर्जफेडीची मुदत ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याची … Read more

सावकारीच्या जाचातून शेतकऱ्याची आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । मिरज तालुक्यातील कदमवाडी येथील संजय कदम या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहा शेजारी शेतीच्या औषधाची बाटली आढळून आली होती. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली होती. संजय कदम यांची पत्नी जयश्री कदम यांनी माझे पती सावकारीच्या जाचातून त्यांनी औषारी औषध प्राशन करून आत्महत्या … Read more

धक्कादायक! कोल्हापूर महापालिकेसमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयन्त

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरातील कसबा बावडा येथील आनंदा करपे या शेतकऱ्याने आज महापालिकेच्या गेटवरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी समयसूचकता दाखवत महापालिका कर्मचाऱ्यांनी तत्काळ शेतकऱ्याला वाचवत ताब्यात घेतलं. टीडीआर स्वरूपातील मोबदला मिळण्यात दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ या शेतकऱ्याने हे पाऊल उचलले. यासंदर्भात त्यांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन तसेच … Read more

सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली प्रतिनिधी ।  कळमनुरी तालुक्यातील चिखली येथील ३६ वर्षीय शेतक-याने सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. गणेश रामराव चव्हाण असं शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या आत्महत्येनंतर गावावर शोककळा पसरली. मयत चव्हाण अल्पभूधारक शेतकरी होते. मागील तीन वर्षापासून शेतात नापिकीच सुरू होती. त्यातच मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसानं शेतात लागवड केलेले सोयाबीन पिकाचे नुकसान … Read more

शेतकरी आत्महत्येला शरद पवारच जबाबदार – रघुनाथदादा पाटील

सोलापूर प्रतिनिधी । शरद पवार जसे चांगल्या कामाचे श्रेय घेतात तसेच अपयशाची जबाबदारी घेणेही गरजेचे असल्याचं मत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलं आहे. चांगल्या कामाचे श्रेय आम्ही त्यांना देवू मात्र शेतकरी आत्महत्यांचीही जबाबदारी त्यांनी स्विकारावी असं पाटील म्हणाले आहेत. पुढे बोलताना पंडित जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी शेतकरी विरोधी धोरणे राबविल्याची टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले कि, शेतकरी कर्जबाजारी होण्याचं मुख्य कारण हे शेतमालाला न मिळणार भाव आहे. अमी कारण म्हणजे याबाबतच सरकारी धोरण. जोपर्यंत सरकार शेतमालाच्या भावाबाबत धोरण बदलत नाही शेतकरी विरोधी कायद्यात बदल करणार नाही तोपर्यंत शेतकरी कर्जबाजारी राहणार आहे. राज्यात नवीन सरकार आलं असलं तरी केवळ चेहरे बदलले आहेत सरकार तेच आहे. तरी सुद्धा यासरकाराला शेतकरी धोरणात बदल करण्यासाठी भाग पडण्याची भूमिका शेतकरी संघटनेनं घेतली आहे. रघुनाथ पाटील यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

ओल्या दुष्काळाने घेतला शेतकऱ्याचा बळी

परतीच्या पावसाने राज्यभरात थैमान घातले. या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान केले. नुकसान झालेल्या शेतमालाचा दाह आता शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करताना दिसत आहे. बीडमधील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीचे लग्न कसे करावे या नैराश्येतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. 

अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने दिला आत्महत्येचा इशारा

परभणी प्रतिनिधी। जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथील एका शेतकऱ्याला पाझर तलावासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी मागील १० वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे ‘मागील दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांच्या संगनमताने अडवणूक करत असल्याचे निवेदन भूसंपादन अधिकाऱ्यांच्या मार्फत दिनांक २८ सप्टेंबर रोजी संबंधित शेतकऱ्याने दिले असून मोबदला तत्काळ द्यावा अन्यथा आत्महत्या केल्याशिवाय … Read more

शेतकरी आत्महत्येला शेतकरीच जबाबदार- प्रकाश आंबेडकर

यवतमाळ प्रतिनिधी। शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी शेतकरीच जबाबदार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी विवादास्पद वक्तव्य केलं आहे. यवतमाळ इथं बोलतांना त्यांनी ही मुक्ताफळं उधळली. शेतकरी जात पाहून मतदान करतो. त्यामुळं शेतकऱ्याची ही अवस्था आहे. वंचित बहुजन आघाडीला मतदान केल्यास कापसाला हमी भावाप्रमाणे पैसे मिळतील. तर जात पाहून मतदान केल्यास 3500 रु प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळणार. असं म्हणून … Read more

धनंजय मुंडे सारख्या वाघाला विधानसभेत पाठवा : अमोल कोल्हे

मुंबई प्रतिनिधी | नोटाबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली सत्ताधाऱ्यांनी दिली . याअगोदरच भाजप पक्षाच्या २२ नेत्यांचे घोटाळे मुंडे साहेबांनी समोर आणले.हे करण्यासाठी मर्दाचं काळीज लागतं. तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन अशी स्थिती बीडमध्ये आहे. तुम्हाला महाराष्ट्राच्या वाघाला निवडणूक आणण्याची संधी मिळत आहे ही संधी सोडू नका अशा शब्दात धनंजय मुंडेंना विजयी करण्याचे … Read more

३ महिन्यात ६१० शेतकरी आत्महत्या ; सहकार मंत्र्यांची विधानसभेत माहिती

मुंबई प्रतिनिधी | जानेवारी ते मार्च २०१९ या तीन महिन्याच्या कालखंडात ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशी माहिती सहकार आणि मदत , पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. ते विधान सभेत बोलत होते. ६१० शेतकरी आत्महत्या प्रकरणातील १९२ प्रकरणे समितीने मदतीस पात्र ठरवली आहेत. तर १८२ प्रकरणात मदत देण्यात आली आहे. ९६ प्रकरणे निकषात बसत … Read more