NDA ने आम्हाला बिहार निवडणूकी मध्ये पाच जागा द्याव्यात ; नाहीतर आम्ही स्वतंत्रपणे 15 जागांवर लढू – रामदास आठवले

मुंबई प्रतिनिधी । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चा घटक पक्ष आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष NDA च्या सोबत बिहार निवडणूकीमध्ये उतरेल. त्यामुळे आम्हाला देखील ह्या निवडणूकी मध्ये सहभागी करून घ्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली … Read more

रामदास आठवलेंनी दिली शरद पवारांना भन्नाट ऑफर, म्हणाले..

मुंबई । केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ऑफर दिली आहे. काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन शरद पवारांना काँग्रेसचं अध्यक्ष करावं असंही विधान केलं होतं. मात्र, आता शरद पवारांनीच NDA मध्ये सहभागी व्हावं असं आवाहन शरद पवार यांना दिली आहे. राजकीय वर्तुळातील … Read more

शिवसेनेने ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंची ऑफर

मुंबई । शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. ‘शिवसेनेनं चक्रव्यूहात अडकू नये. त्यांनी ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावं. रिपाईंला सोबत घ्यावं आणि राज्यात सरकार स्थापन करावं,’ अशी ऑफर आठवलेंनी दिली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार ५ वर्षे चालणार नाही. कामं होत नसल्यानं अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळे बंडखोरीची … Read more

कंगनावर अन्याय झाला असून BMCच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा! आठवलेंची राज्यपालांकडे मागणी

मुंबई । मुंबई मनपाने अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईसंबंधी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. कंगनावर अन्याय झाला असून तिच्या कार्यालयावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. तसंच तिला नुकसान भरपाई दिली जावी असंही ते म्हणाले आहेत. पालिकेने … Read more

कंगना माझ्या पक्षात आली तर १०० टक्के अन भाजपमध्ये गेली तर ५० टक्के आनंद होईल- रामदास आठवले

मुंबई । सध्या शिवसेना आणि कंगना राणौत यांच्यातील वाद अत्यंत टोकाला गेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी कंगना राणौतची भेट घेतली होती. या भेटीत तुम्ही कंगना राणौतला राजकारणात येण्याची ऑफर दिलीत का, असा प्रश्न आठवले यांना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. त्यावर रामदास आठवले यांनी म्हटले की, होय, मी कंगनाला राजकारणात येण्याविषयी विचारले. तुला राजकारणात … Read more

महाविकास आघाडीच्या सत्तेत दलितांवरील अत्याचारात वाढ- रामदास आठवले

मुंबई । केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलितांवरील हल्ल्यात वाढ झाल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. याविरोधात रिपब्लिकन पक्षातर्फे ११ जुलै रोजी देशभरात आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही आठवले यांनी केली. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी म्हटले … Read more

कोरोनामुळं मृत्यू झालेल्या कोविड योध्यांना शहिदांचा दर्जा द्या- रामदास आठवले

मुंबई । कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीच्या संकटकाळात समाजाच्या रक्षणासाठी कोरोना विरुद्ध लढणारे आणि अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, पोलीस शिपाई, कर्मचारी, रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय तसेच महापालिकेचे कर्मचारी हे सर्व कोरोनायोद्धे आहेत. त्यामुळं कोरोना विरुद्ध लढताना या योद्ध्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना शहिदांचा दर्जा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास … Read more

शरद पवार हे आदरणीय असून त्यांच्याबद्दलचं वक्तव्य पडळकरांनी मागे घ्यावं- रामदास आठवले

मुंबई । शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत, असं आक्षेपार्ह्य विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. गोपीचंद पडळकर यांच्या पडळकरांच्या या विधानवरून राष्ट्रवादीने आंदोलन केलं, तसंच पडळकरांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली. भाजपनेही पडळकर यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण दिलं. दरम्यान, पडळकर यांच्या या विधानावर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही … Read more

.. तर राज्य सरकारचा पाठिंबा काढावा! रामदास आठवलेंचा काळजीपोटी काँग्रेसला सल्ला

मुंबई । काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. मात्र निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घेतले जात नाही. तसं असेल तर काँग्रेसनं राज्य सरकारचा पाठिंबा काढावा,’ असा सल्ला रिपब्लिकन नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला दिला आहे. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावर … Read more

१७ पर्यंत ‘कोरोना गो’ नाही झाला तर लॉकडाऊन ३०मेपर्यंत वाढावा- रामदास आठवले

नवी दिल्ली । करोनाचा प्रसार वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली नाही तर १७ मे पर्यंतचा लॉकडाउन वाढवून ३० मे पर्यंत करावा असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. … Read more