शालेय, महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई । कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३२ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शाळा, महाविद्यालये सुरु करण्यावर निर्बंध आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की … Read more

दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात ऑनलाईन परीक्षा घेणं शक्य नाही- उदय सामंत

मुंबई । राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शविली. दिल्लीने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेतल्या असल्या तरी महाराष्ट्रात हे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाइन परीक्षांबाबतीत कुलगुरूंचं मत प्रतिकूल आहे. ग्रामीण भागात निम्म्या ग्रामपंचायतीत इंटरनेट नाही. ऑनलाईन परीक्षा हा महाराष्ट्रात पर्याय होऊ शकत नाही. भौगोलिक … Read more

जातपडताळणी कागदपत्रांबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

करिअरनामा ऑनलाईन | बारावीचे निकाल लागले आहेत. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी जात पडताळणी प्रमाणपत्रे वितरित करण्यासाठी अशी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या समिती कक्षात नागपूर, … Read more

आदित्य ठाकरेंचे UGC ला चॅलेंज; विद्यापीठ परिक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात धाव

मुंबई । कोरोना संक्रमणामुळे राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या मात्र केंद्र सरकारकडून सर्व काळजी घेऊन तसेच सामाजिक अलगावचे नियम पाळून परीक्षा घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. यावर पुन्हा चर्चा करून राज्य सरकारने परीक्षा न घेण्याचा निर्णय कायम केला होता. आता मंत्री आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या निर्णयाला कायदेशीर रित्या विरोध करत … Read more

इथं विषय चाललाय काय, आपण बोलताय काय! रोहित पवार आणि भाजप नेत्यात ट्विटवर शाब्दिक बाचाबाची

मुंबई । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळं विद्यापीठ अनुदान आयोगानं (यूजीसी) परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार आणि भातखळकर यांच्यात ट्विटवर वॉर सुरु झालं आहे. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? घरी बसल्याबद्दल सर्वाधिक चर्चा राज्यात कुणाबद्दल चालली आहे ते ठाऊक … Read more

किती विद्यापीठे पदवी परीक्षा घेण्यास तयार? UGC ची आकडेवारी आली समोर 

pune university

नवी दिल्ली । काही दिवसांपासून देशात पदवी परीक्षा घेण्याबाबत वेगवेगळ्या स्तरावर आवाज उमटले होते. परीक्षा म्हणजे विध्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ असा निर्णय हायकोर्टाकडून  देण्यात आला होता.  त्यामुळे सर्व स्तरावरील परीक्षा रद्द केल्या गेल्या होत्या. परंतु विदयापीठ अनुदान आयोग UGC मात्र  पदवी  परीक्षा घेण्याच्या निर्णयावरती ठाम आहे. देशात एकूण ९९३ विद्यापीठं आहेत. त्यातील काही ठराविक विद्यापीठांनी परीक्षा … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक, विद्यापीठ परिक्षाबाबत होणार महत्वाचा निर्णय 

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक होणार आहे. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा होणार असून यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे … Read more

ATKT च्या विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारकडून दिलासा! सरासरी गुणांसह सर्वांना पास करणार

uday samant

मुंबई | राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत सरकारचा सावळा गोंधळ सुरु अाहे. केंद्रीय गृहखात्याने विद्यापीठ परिक्षांना परवानगी दिल्यानंतर युजीसीने अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याबाबत राज्य सरकारला अधिसुचना पाठवली होती. मात्र परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना सरासरी गुणांद्वारे पास करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ATKT च्या विद्यार्थ्यांना … Read more

विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू होणार

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद आहेत. अशा वेळी मनुष्यबळ विकास मंत्रालय(HRD Ministry) व UGCच्या बैठकीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय या बैठकीत झाल्याचं समजतंय. ‘साम टीव्ही’च्या वृत्तानुसार, JEE-NEET परीक्षांचे निकाल लागेपर्यंत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, असा निर्णयही … Read more

राजकारण करायला निवडणुका आहेत ना, विद्यार्थ्यांच्या जीवाशी कशाला खेळ करता- उदय सामंत

मुंबई । विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात येणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर आता राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकारला पत्र धाडले आहे. दरम्यान या मुद्द्यावर उदय सामंत यांनी मंगळवारी ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले की, अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ नयेत, या भूमिकेवर राज्य सरकार ठाम आहे. … Read more