‘हा’ आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार

मुंबई प्रतिनिधी। विधानसभा निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. आता पर्यंत महाराष्ट्रातील सर्वच उमेदवारांचे निवडणूक उमेदवारी अर्ज भरून झाले आहेत. दरम्यान, या उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांची संपत्तीची माहिती आता समोर आली आहे. त्यातुन महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. … Read more

संजय दीना पाटील यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, शिवसेनेत केला प्रवेश

मुंबई प्रतिनिधी। विधानसभा निवडणुक अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. मात्र, आज सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांकडून पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचं सत्र कायम रहिले. राष्ट्रवादीचे नेते व माजी खासदार संजय दिना पाटील यांनी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले. निवडणुक जाहीर होण्याआधी राष्ट्रवादीच्या सचिन अहिर, रश्मी बागल, जयदत्त क्षीरसागर अशा नेत्यांनी खांद्यावर भगवा … Read more

‘या’ १८ आमदारांना भाजपनेच नाकारले; पक्षांतर्गत विरोधक कमी करण्यात फडणवीसांना यश

मुंबई प्रतिनिधी | २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तिकीट वाटपात भाजपकडून तब्बल १८ विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यातील अनेकजण हे १० वर्षांपेक्षा अधिक काळ पक्षामध्ये सक्रिय राहिले आहेत. निष्ठवंतांना डावलून आयारामांना किंवा डावलण्यात आलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तिकिट देण्यात आले आहे. नाराज विद्यमान आमदारांपैकी काही जणांनी बंडखोरी केली असून काहींनी पक्षनिष्ठ राहण्यावरच भर … Read more

जागावाटपात ‘स्वाभिमानी’ला ५ जागा, शिरोळमधून राजू शेट्टी की सावकार मादनाईक?

कोल्हापूर प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळसह राज्यातील पाच जागा मिळाल्या आहेत. यामुळे इच्छुकांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धांदल सुरू झाली आहे. शिरोळ मधून सावकर मादनाईकांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. कार्यकर्त्यांचा दबाव वाढला तर ऐन वेळी स्वाभिमानीचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची … Read more

अहेरीत भाजपकडून पुन्हा अंबरीश आत्रामच; ग्रामसभेचा उमेदवार निर्णायक भूमिका बजावणार

गडचिरोली प्रतिनिधी। भाजपाच्या पहिल्याच उमेदवार यादीत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी दोन्ही विद्यमान आमदारांना जाहिर करण्यात आली होती. मात्र अहेरी विधानसभा क्षेत्राचा या यादीत समावेश नव्हता. यामुळे अहिरीचे विद्यमान आमदार राजे अम्ब्रीश आत्राम यांचा पत्ता कट होणार की काय अशी अशी शंका आत्राम समर्थकांना वाटत होती. शेवटी भाजपाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत … Read more

परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात महायुतीच्या मित्रपक्षांनी केली घुसखोरी

परभणी प्रतिनिधी| गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागेसाठी राजकीय पक्षांकडून तिकीट वाटपामध्ये अनपेक्षित उलटापालट झाली असून जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये राजकीय बंडखोरांच्या ‘इंट्री’मुळे बहुरंगी निवडणूक लढती होणार आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात यावेळी महायुतीच्या मित्रपक्षांनी घुसखोरी केल्याने सेनेचे पाथरी आणि जिंतूर बालेकिल्ले मात्र लढती पूर्वीच ढासळले आहेत. महायुतीच्या जागा वाटपामुळे शिवसेनेची स्वतःच्या घरात चांगलीच गोची झाली आहे. … Read more

‘माझी हक्काची जागा मला मिळाली, हे कोणाचे उपकार नाहीत’- विजय शिवतारे

पुणे प्रतिनिधी। ‘महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही सूत्र ठरले होते. त्यानुसार, माझी हक्काची जागा मला मिळाली. महायुतीमधील पक्षाच्या विद्यमान आमदारांच्या जागा त्याच पक्षाकडे राहतील, हे निश्चित होते. त्यामुळे आज जागा वाटप झाल्यानंतर पुरंदरचा विद्यमान आमदार असल्याने ही माझी हक्काची जागा मला मिळाली. ती देऊन कोणी माझ्यावर उपकार केलेले नाहीत’, असा टोला शिवसेनेचे मंत्री आमदार विजय शिवतारे … Read more

गंगाखेड येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचे ‘आत्मक्लेश आंदोलन’

परभणी प्रतिनिधी । भाजपा च्या कोट्यातील जागा ‘शिवसेने’ला सोडल्याने गंगाखेड विधानसभेतील इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत.  या नाराजीतून आज गंगाखेड येथे इच्छुक उमेदवार ,कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ‘आत्मक्‍लेश आंदोलन’ केले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागा कोणता पक्ष , कोणत्या उमेदवाराला देणार याविषयी प्रत्येक पक्षाकडून कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली होती. … Read more

काँग्रेसच्या दिलीप सानंदांची निवडणुकीतून माघार; ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत घेतला निर्णय

बुलडाणा प्रतिनिधी। बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सानंदा यांच्या निवडणूक न लढवण्यामागे एक वेगळेच असल्याचे कारण समोर येत आहे. ईव्हीएमने घेतल्या जाणाऱ्या मतदानावर संशय असल्याचे कारण पुढे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. ईव्हीएमच्या मुद्यावर निवडणुकीतूनच माघार घेण्याची भूमिका घेणारे … Read more

भाजपच्या पहिल्या यादीत अमरावती जिल्ह्यातील ‘या’ ३ नावांचा समावेश

अमरावती प्रतिनिधी। भाजपाची पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही घोषणा केली. सोबतच बहुप्रतिक्षीत असलेल्या यादीत सर्वांचे लक्ष लागून असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघाच्या उमेदवारांची देखील नावे जाहीर झाली आहेत. या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत अमरावती जिल्ह्यातील ३ नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे … Read more