‘आजही गोडसे जिवंत’; जामिया गोळीबार प्रकरणी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

दिल्ली येथे एका तरूणाने जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर गोळीबाराच्या घटनेवरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ”सत्ताधीशांना विरोध सहन होत नाही, आजही गोडसे जिवंत आहे. केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही विरोधात देशभरात जनता शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करतआपली भूमिका मांडत आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांचे हस्तक गोळीबार करत आहेत, अशी टीका जलसंपदामंत्री  जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील, विश्वजित कदमांवर गुन्हा दाखल करा! सांगली भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसांत धाव

एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात सांगलीमध्ये २५ जानेवारी रोजी भाजप वगळता काढण्यात आलेल्या सर्व पक्षीय मोर्चामध्ये जलसंदमंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज थेट जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीकरत शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांच्या शिष्टमंडळाने आज पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्याकडे तक्रार दाखल केली.

जयंत पाटलांकडे जलसंपदा खाते आल्याने सांगली जिल्ह्यातील सिंचन योजना पूर्ण करण्याचे आव्हान

राज्याचे जलसंपदा खाते जयंत पाटील यांच्याकडे आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या असून ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, वाकुर्डे या योजनांच्या पुर्ततेला आता गती येईल. जतच्या ४२ गावांचा प्रश्न मार्गी लागले, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राजारामबापूंच्या पावलावर पाऊल ठेवून ते या योजनांसाठी ५ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतो.

शरद पवारांना राजकारणात हरवण्याचा प्रयत्न म्हणजे सुर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार – जयंत पाटील

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भुमिका स्पष्ट केली. रविवारीही अजित पवार यांनी ट्विट करुन आपण राष्ट्रवादीसोबतच असल्याचे सांगितले. मात्र शरद पवार यांनी राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. अजित पवारांच्या सदर … Read more

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी जयंत पाटील, अजित पवारांचे सर्वाधिकार राष्ट्रवादीने काढले

पक्षांतर्गत बंडाळी करून पक्षाला फुकटचा शहाणपणा करणाऱ्या अजित पवार यांना राष्ट्रवादीने घरचा रस्ता दाखवला आहे. राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांना असलेले सर्व अधिकार काढुन घेण्यासोबत त्यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ कमिटीने केली आहे. शनिवारी सायंकाळी याबाबतचा अधिकृत निर्णय घेण्यात आला.

आम्हाला आमचं वास्तव माहित आहे, राष्ट्रवादी स्वप्नरंजनात नाही – जयंत पाटील

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेना भाजपबरोबर सत्तेत बसतांना आपल्या अटींवर कायम असून राज्यात सत्ता नेमकी कोणाची येणार हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे. भाजपवर दबाव तंत्राचा वापर करत शिवसेना इतर पर्यायांचा विचार करू शकते असे संजय राऊत वारंवार सां

काँग्रेसला मतदान करून महापुराचा बदला घ्या – जयंत पाटील

महापुराच्या काळात भाजप सरकारने मदत केली नाही. मंत्री व आमदारांनी सांगलीत येऊन शो बाजी केली. पुरामुळे सात दिवस जनतेचे आतोनात हाल झाले. त्याचा बदला घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसला साथ द्यावी व कमळाबाईने दिलेला त्रास वसूल करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. महाअघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडी येथील राम मंदिरसमोर सभा पार पडली. या सभेत आ.जयंत पाटील बोलत होते. सभेला विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, संजय बजाज, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या ‘पैलवान’ वक्तव्यावरून जयंत पाटलांना हसू आवरेना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार प्रचार सभेत आपण तेल लावून लढाईसाठी तयार आहोत असे सांगत आहेत, मग त्यांनी त्यांचा तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा. महाराष्ट्राला कळूदेत कि तेल लावलेला मुख्यमंत्री कसा दिसतो. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली.

आज ताकद दाखविली तरच पुढच्या निवडणुकीपर्यंत तुमचे अस्तित्व टिकेल, जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

काँग्रेस-राष्ट्रवादीने आता एकत्र काम करून भाजपचा पाडाव करणे आवश्यक आहे. आज राजकीय ताकद दाखविली तरच पुढच्या महापालिका निवडणुकीपर्यंत तुमचे अस्तित्व टिकेल, त्यासाठी आता कामाला लागावे व काँग्रेसला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिल्या. महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार पाटील यांनी आघाडी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आ.पाटील बोलत होते. बैठकीला उमेदवार पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, मनिषा रोटे, उत्तम साखळकर, नामदेवराव मोहिते, संजय बजाज, कमलाकर पाटील, मैनुद्दीन बागवान, महेश खराडे आदी उपस्थित होते.

‘शेकाप’च्या जयंत पाटील यांच्यासह चार आमदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

विधानसभा निवडणूक शांततेत आणि भयमुक्तपणे पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ांत आत्तापर्यंत १ हजार ६४६ जणांवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात चार आमदारांचाही समावेश आहे.