नोकरी जाण्याची बाळगू नका भीती! मोदी सरकार आहे पाठीशी; आणली ‘ही’ नवी योजना

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे देशाचं अर्थकारण मंदावलं आहे. याची सगळ्यात जास्ती झळ खासगी क्षेत्रातील उद्योगांना बसली आहे.  अशात व्यापार कमी झाल्यानं अनके कंपन्या नोकर कपात करण्याच्या तयारीत आहेत. म्हणून जर तुम्ही खासगी क्षेत्रातील कंपनीत काम करत आहात आणि जर नोकरी जाण्याची चिंता सतावत असेल तरी काळजी करू नका. तुम्हाला ‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ या योजनेता लाभ … Read more

नोकरी गेली तरी घाबरू नका! मोदी सरकारची ही योजना आपल्याला देईल पुढील २ वर्षांसाठी पगार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आली आहे. यामुळे बर्‍याच कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे तर कुठेतरी वेतन कपात केली जात आहे. या संकटात असे कोणतेही उद्योग नाही आहेत जेथे लोकांच्या नोकर्‍यावर संकट आलेले नाही. बर्‍याच कंपन्यांनी कर्मचारी कपातही सुरू केली आहे. आपल्याला देखील नोकरी संबंधित समस्या येत असल्यास,ही … Read more

‘मी पंतप्रधान असतो तर IFSC केंद्र बिहार, उत्तर प्रदेशात नेलं असतं’; संजय राऊत असं का? म्हणाले

मुंबई । आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) मुंबईऐवजी गुजरातमध्ये हलविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. एका यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विषयावर आपलं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मी पंतप्रधान असतो तर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) गुजरातऐवजी बिहार, उत्तर प्रदेश किंवा पश्चिम बंगालसारख्या राज्यात नेलं … Read more

आमचं हिंदुत्व विखारी, विषारी नाही; संजय राऊतांनी हाणला भाजपाला टोला

मुंबई । ‘मी स्वत: प्रखर हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्वाचा विचार अनेक व्यासपीठांवरून सातत्यानं मांडत आलोय. पण आमचं हिंदुत्व विखारी, विषारी नाही. देश तुटावा, आणखी एक पाकिस्तान निर्माण व्हावा. व्होटबँका निर्माण कराव्यात हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता,’ असं खासदार संजय राऊत म्हणाले.एका यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीबरोबरच भाजपच्या कारभारावर परखड भाष्य केलं. ‘देशात गृहयुद्ध … Read more

प्रत्येकवेळी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून भाजपने स्वतःच्या सुटकेस भरल्या- प्रियांका गांधी

नवी दिल्ली ।  जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दराने निचांकी स्तर गाठला आहे. अशा वेळी मोदी सरकारनं इंधनवर उत्पादन शुल्क वाढवण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे कच्च्या तेलात झालेल्या घसरणीचा फायदा कोणालाही मिळणार नाही. मंगळवारी रात्रीपासून पेट्रोलवर १० रूपये तर डिझेलवर १३ रुपयाचे उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपावर कडाडून … Read more

६४.५ लाख लोकांना मिळणार वर्षाला ३६ हजार रुपये; तुम्ही पण ‘असा’ घेऊ शकता फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असंघटित क्षेत्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या तीन पेन्शन योजनांमध्ये आतापर्यंत ६४,४२,५५० लोकांनी नोंदणी केली आहे. ज्यांना आता वार्षिकरित्या ३६ हजार रुपये पेन्शन मिळेल.आपणही या पेन्शन योजनेत नोंदणी करून आपले म्हातारपण सुरक्षित करू शकता. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना (पीएम-एसवायएम), पीएम किसान महाधन (पीएम-केएमडीवाय) आणि स्मॉल बिझिनेस पेन्शन योजना या अशा … Read more

लॉकडाऊन ठीक आहे पण पुढे काय? सोनिया गांधींची मोदी सरकारच्या धोरणावर टीका

नवी दिल्ली । कोरोनाचा उद्रेक आणि लॉकडाउनबाबत केंद्र सरकारची पुढील रणनीती काय आहे, असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे.या बैठकीला माजी पंतप्रधान … Read more

केंद्र सरकार मोठं पॅकेज जाहीर करणार? मोदी, शाह आणि सीतारामन यांच्यात बैठक

नवी दिल्ली । कोरोनामुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच दुसरं प्रोत्साहनपर पॅकेज अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची याबाबत बैठकही झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी, गृह मंत्री अमित शाह आणि निर्मला सीतारामन यांच्यासोबतच्या या बैठकीला अनेक वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह आणि … Read more

महाराष्ट्रावरील ‘त्या’ अन्यायकारक निर्णयाची केंद्राला मोठी किंमत चुकवावी लागेल- खासदार शेवाळे

मुंबई । केंद्र सरकारने मुंबईच्या आकसापोटी आणि गुजरातवरील प्रेमापोटी मूळ निर्णयात फेरफार करून ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र’ (IFSC) गांधींनगर गुजरात येथे हलविण्याचा घेतलेला निर्णय आक्षेपार्ह आहे. दरवर्षी मुंबईतून केंद्राला सुमारे पावणे २ लाख कोटींचा कर दिला जातो. तसेच देशभरातील 90 टक्के व्यापारी बँकिंग, ८० टक्के म्युच्युअल फंडची नोंदणी मुंबईतुन होते. या सर्व बाबींचा विचार करता, … Read more

मोदींच्या बचावासाठी फडणवीस मैदानात; IFSC केंद्र गुजरातला हलवण्याला काँग्रेस जबाबदार

मुंबई । मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी (IFSC) गुजरातला हलवण्यासंबंधी मोदी सरकारनं महाराष्ट्रावर अन्याय केल्याची चर्चा होत असताना राज्यातील भाजपचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मोदी सरकारच्या बचावासाठी आता मैदानात उतरले आहेत.  आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला हलविण्याबाबत महाराष्ट्रात सर्व स्तरातून मोदी सरकारवर संताप व्यक्त होत असताना फडणवीस यांनी फेसबुक लाईव्हद्वारे काँग्रेसलाच आरोपीच्या … Read more