गृहमंत्रालयाचा आदेश म्हणजे तुघलकी फरमान; लोकांना बसने गावी पाठवायला लागतील ३ वर्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउनमुळे इतर राज्यात मोठ्या संख्येने लोक अडकले आहेत.सध्या अस्तित्त्वात असलेल्या परिस्थितीचा विचार करता अडकलेल्या लोकांना घरी परत आणण्यासाठी गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना परवानगी दिलेली आहे. आतापर्यंत केवळ बसच्या माध्यमातून लोकांना परत आणण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयाचे वर्णन काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी तुघलकी फरमान म्हणून केले … Read more

गुजरात दिनानिमित्त पंतप्रधानांकडून महाराष्ट्राचं खच्चीकरण? मुंबईचं IFSC सेंटर गांधीनगरला हलवणार

नवी दिल्ली । मुंबई शहरातील बीकेसीमध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) केंद्र सरकारने गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्थापना दिनीचं हा निर्णय घेऊन एक प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय केल्याचे बोलले जात आहे. यापुढे सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा या गांधीनगरमधील आर्थिक सेवा केंद्रामार्फत चालणार आहेत. याचं मुख्यालय गांधीनगर, गुजरात येथे असणार आहे. सध्या, … Read more

लॉकडाऊनमध्ये गरिबांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयन्त पुरेसे नाहीत- अभिजित बॅनर्जी

नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या गरीबांसाठी भारत सरकारने पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत, अशी प्रतिक्रिया नोबेल विजेते अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी दिली. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी सरकारला गरीबांसाठी आणखी बरंच काही करण्याची गरज असल्याचं म्हटलं. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारकडून गरीबांच्या खात्यात थेट अर्थसहाय्य आणि अन्न सुरक्षा उपलब्ध करुन देणे असे उपाय केले … Read more

हवं तर बुलेट ट्रेन प्रकल्प थांबवा! कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कपात काय करता- राहुल गांधी

नवी दिल्ली । कोरोनाशी सातत्याने लढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशातल्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी मोदी सरकारने बुलेट ट्रेनचा लाखो-कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प स्थगित का केला नाही? अशी विचारणा माजी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशातील अर्थव्यस्थेवर येणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत मोदी सरकार गंभीर नसल्याच्या मुद्यावर … Read more

रुपयाने गाठला निचांक; मोदी सरकारच्या चिंतेत वाढ

मुंबई । जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि करोना बळींची संख्या वाढल्याने आज चलन बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाने ७६.९१ चा सार्वकालीन नीचांक गाठला.  रुपयातील अवमूल्यन झाल्याने केंद्र सरकारच्या चिंतेत भर पडणार आहे. याचसोबत आयात बिलासाठी जादा खर्च करावा लागणार आहे.भांडवली बाजारात परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. एप्रिलमध्ये आतापर्यंत परकी … Read more

गरिबांच्या खात्यात 7 हजार 500 रुपये जमा करा; काँग्रेसची मोदी सरकारला मागणी

नवी दिल्ली । देशातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या बँक खात्यात मोदी सरकारने जमा केलेली मदत अपुरी आहे. त्यामुळे सरकराने त्यांच्या खात्यात 7,500 रुपये टाकावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारकडे करण्यात आली आहे. याचबरोबर प्रत्येक जनधन खाते, पेन्शन खाते आणि पीएम किसान खात्यात ही रक्कम सरकारने जमा करावी अशी मागणीही काँग्रेसने … Read more

ट्रेनमध्येच उभारणार रुग्णालय; मोदी सरकारची योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काही दिवसात करोनाचा प्रादुर्भाव देशातील ग्रामीण भागाला झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन खबदारीचा उपाय म्हणून मोदी सरकारनं रेल्वेतच वैद्यकीय सुविधां पुरवण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, रेल्वेच्या बोगींना आयसीयू, क्वारंटिन वार्ड आणि आयसोलेशन सेंटरमध्ये बदलण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत. … Read more

लॉकडाऊनच्या काळात गरिबांसाठी केंद्राने केली ‘ही’ मोठी घोषणा; देशातील ८० कोटी लोकांना लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. मात्र, त्यानंतर करोनामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या उदरनिर्वाहाचं काय? अशी विचारणा लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर उपस्थित करण्यात येत होती. यासंदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात गरिबांचे हाल होऊ नयेत यासाठी केंद्रानं पाऊल उचलत देशातील ८० कोटी … Read more

रेशन आणि औषध स्टोअरसह या अत्यावश्यक सेवा राहणार सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता, केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरात येत्या २१ दिवसांपासून राबविण्यात येणाऱ्या लॉकडाऊन दरम्यान आवश्यक सेवा, प्रभावी उपाय आणि अपवाद या संदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वामध्ये असे नमूद केले आहे की या सेवा २१ दिवसात कार्यरत राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना विषाणूपासून … Read more

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगची झलक, अमित शाह म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा एक फोटो सध्या शेअर केले जात आहे, ज्यामध्ये आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्री पंतप्रधान मोदींच्या आसपास सुरक्षित अंतरावर … Read more