RBI ने ‘या’ २ बॅंकांना ठोठावला ६.२ कोटींचा दंड; जाणून घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील ‘बँक ऑफ इंडिया’ला तब्ब्ल पाच कोटींचा दंड ठोठावला आहे. यामध्ये नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (एनपीए) संबंधित तरतुदी देखील समाविष्ट आहेत. त्याशिवाय एनपीएच्या नियमांचे पालन न केल्याने कर्नाटक बँकेलाही रिझर्व्ह बँकेने १.२ कोटी रुपयांचा दंड लादला आहे. यासाठी बँक ऑफ इंडियाला दंड … Read more

विरोधी पक्ष नेत्यांनी प्रत्यक्ष खर्चाचे पॅकेज किती आणि कर्जाचे पॅकेज किती याची आकडेवारी सादर करावी – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याला केंद्राकडून २, ७०, ००० रु आल्याचा दावा केला तसेच त्याची आकडेनिहाय वर्गवारी ही सादर केली. यानंतर काँग्रेस नेते यांनी आपले मत मांडले आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व रक्कम थेट महाराष्ट्राच्या तिजोरीत येणार असल्याचे भासविले असून ते … Read more

प्रत्येक पॅकेजसाठी ‘RBI’ची दारं ठोठावू नका! नाहीतर..; ‘या’ अर्थतज्ज्ञानं दिला मोदी सरकारला गंभीर इशारा

नवी दिल्ली । प्रत्येक आर्थिक संकटावेळी जर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या दाराशी गेलात तर तुम्ही बँकेला खिळखिळी कराल. यामुळे आधीच रडतखडत सुरु असलेली गुंतवणूक आणि विकासदराची गाडी आणखी खाली घसरेल, असा इशारा वर्ल्ड बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजचा जास्तीत जास्त भार … Read more

RBI ने रद्द केला या बँकेचा परवाना; महाराष्ट्रातील लाखो खातेदारांना बसणार फटका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सीकेपी सहकारी बँक लिमिटेडच्या ग्राहकांना धक्का देताना या बँकेचा परवाना रद्द केला आहे. मनीकंट्रोलच्या मते, यामुळे सुमारे १.२५ लाख बँक खातेदारांवर संकट उभे राहिले आहे. बॅंकेची ४८५ कोटींची एफडी देखील यामुळे अडकल्या आहेत. २०१४ पासून आरबीआय सतत बँकेवरील बंदीची मुदत वाढवत होता.यापूर्वीही ३१ मार्च रोजीची मुदत ही … Read more

देशातील ५० कर्जबुडव्या उद्योगपतींचं तब्बल ६८ हजार ६०७ कोटींचे कर्ज RBI ने केलं माफ

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने ५० बड्या कर्जबुडव्यांचे जवळपास ६८ हजार ६०७ कोटी रुपये कर्ज माफ केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतून हे सत्य समोर आलं आहे. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ५० मोठे कर्जबुडवे आणि त्यांची १६ फेब्रुवारीपर्यंत कर्जाची स्थिती काय आहे? याची माहिती मागवली होती. त्यात आरबीआयने ५० … Read more

ईएमआय तीन महिने स्थगित आरबीआयचा बँकांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसमुळे सामान्यांसोबतच उद्योगांवर कोरोनाचा प्रभाव पाहता सरकार कर्जाच्या ईएमआयवर दिलासा देण्याची तयारी करत आहे,” असं रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. यासोबत आरबीआयने बँकांना तीन महिने ईएमआयची वसुली स्थगित करण्याचा सल्ला दिला आहे. हा आरबीआयचा आदेश नाही तर केवळ सल्ला आहे. याचाच अर्थ चेंडू आता बँकांच्या … Read more

रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर; पुढील २ महिन्यांसाठी रेपो रेट जैसे थे!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । वर्ष २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेनेही पुढील कालावधीसाठीचं आपलं पतधोरण जाहीर केलं आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा समितीनं पुढील दोन महिन्यांसाठी रेपो रेट ५.१५ टक्केच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची मंगळवारपासून द्विमासिक पतधोरण बैठक … Read more

आर्थिक आघाडीवर मोदी सरकारला आणखी एक धक्का, जीडीपी वाढीचा वेग ५ टक्केच राहील

सर्वसामान्यांना धक्का देणाऱ्या रिझर्व बँकेने मोदी सरकारलाही धक्के दिले आहेत. या आर्थिक वर्षात विकास दर वाढीचा वेग ६.१ टक्के राहील असा अंदाज वर्तवणाऱ्या रिझर्व बँकेन आता त्यात १.१ टक्क्याची कपात केली आहे. या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा वेग ५ टक्केच राहील, असा अंदाज रिझर्व बँकेने व्यक्त केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारवरच आर्थिक मंदीचं संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पीएमसी बँकला कायमचे टाळे लागणार?

मुंबई प्रतिनिधी। पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) बँक आर्थिक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले असून सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रिझर्व्ह या आदेशनानंतर बँकेला कायमचे टाळे लागण्याची परिस्थिती वेळ आली आहे. बँक आर्थिक डबघाईला आल्यामुळेच आरबीआयने हा निर्णय घेतला असून, या निर्णयाने खातेदारांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. … Read more

रिझर्व्ह बँकेबाबत राज ठाकरेंचं भाकित खरं ठरलं ? व्हिडिओ शेअर करत मनसेचा दावा

टीम, HELLO महाराष्ट्र |नोटाबंदी आणि जीएसटीमुळे पार विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला रिझर्व्ह बँकेच्या‘रिझर्व्ह’चं ठिगळ लागणार, हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं भाकित खरं ठरलं, असं ट्वीट मनसेने केलं आहे. 9 ऑगस्टला राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत हा दावा करण्यात आला आहे. ‘नोटबंदी आणि जीएसटीमुळे पार विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला रिझर्व्ह बँकेच्या ‘रिझर्व्ह’चं ठिगळ लागणार’… हे राजसाहेबांचं … Read more