मध्यरात्री आलेल्या “त्या” फोनमुळे पृथ्वीराज चव्हाणांचे आयुष्यच बदलून टाकले | वाढदिवस विशेष

हॅलो विधानसभा | पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव एक आदर्श व कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणुन नेहमीच घेतलं जातं. स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री अशी चव्हाण यांची ख्याती आहे. मुख्यमंत्री पदावर असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी कधीच आपल्या जवळच्या लोकांच्या फाईली माणुस आपल्या गटातला आहे म्हणुन सह्या करुन पुढे पाठवण्याचं काम केलं नाही. पदाचा गैरवापर स्वत; केला नाही आणि सहकार्यांनाही करु दिला नाही. यामुळे त्यांची जनसामान्यात आजही एक वेगळी प्रतिमा आहे. त्यांच्याच पक्षातील, मित्र पक्षांतील लोकांनी त्यांच्यावर कुरखोड्या करण्याचा प्रयत्न केला, त्यांना अकार्यक्षम ठरवलं पण तरी चव्हाण यांनी आपल्या निर्णयांतून आपल्या कामाची छाप पाडली. ते कायम काँग्रेसशीच एकनिष्ठ राहीले. आजच्या घडीला ताटातली भाजी बदलावी त्याप्रमाणे पक्ष बदलण्याचं सत्र सुरु असणार्‍या काळात पृथ्वीराज चव्हाणांसारखा सच्चा माणुस कसा काय बरं राजकारणात पडला असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्याचं झालं असं… Prithviraj Chavan Education

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म १७ मार्च १९४७ चा. वडील आनंदराव चव्हाण पंडीत नेहरुंचे सहकारी आणि ११ वर्ष केंद्रात मंत्री. पुढे आई देखील खासदार. मात्र तरुण पृथ्वीराजचं मन काही राजकारणात नव्हतं. त्या काळात चव्हाण यांनी बी.ई. (आॅनर्स) चे शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या केलिफोर्निया विद्यापिठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. आणि अभियंता म्हणुन एका मोठ्या संस्थेत नोकरी सुरु केली. भाषांच्या संगणकीकरणाविषयी चव्हाण यांनी संशोधन केलं. हे सगळं सुरु असताना १९९१ साली एकदिवस मध्यरात्रीच्या २ वाजता त्यांचा फोन खणानला. त्याकाळी काँग्रेस हायकमांडच्या एका फोनने देशाची राजकीय गणितं बदलायची. पृथ्वीराज चव्हाण यांना आलेला फोन दिल्लीवरुनच होता. राजीव गांधी बोलत होते. “पृथ्वीराज आपको कराडसे लोकसभा चुनाव लढना है। अभी जल्द जा कर चुनाव का अर्ज दर्ज करो. आपका प्रचार करणे मै खूद आऊंगा।” असं राजीव गांधींनी तिकडून सांगितलं. राजीव गांधींकडे तेव्हा एक तरुन, तडफदार नेतृत्व म्हणुन पाहिलं जात होतं. त्यांना पृथ्वीराज चव्हाणांसारख्या हुशार, अभ्यासू, आणि जनतेशी आस्था असणार्‍या नेत्यांची फळी बांधायची होती. त्याचसाठी त्यांनी चव्हाण यांची निवड केलेली. Prithviraj Chavan Education

हायकमांडचा फोन आल्यानं पृथ्वीराज चव्हाण पहाटेच पुण्याहून कराडला निघाले. उमेदवारी अर्ज भरण्याचा तो शेवटचा दिवस होता. कसातरी गडबडीत त्यांनी अर्ज भरला. थोडा धोडका प्रचार केला. आणि ते खासदार म्हणुन निवडून आले. पुढे केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांनी जबाबदारीची कामं पाहीली. नंतर २०१० रोजी पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मंध्यरात्री आलेल्या त्या एका फोनमूळे चव्हाण यांचे आयुष्यच बदलून टाकले. एक तरुण उच्चशिक्षित इंजिनिअर खासदार झाला. Prithviraj Chavan Education

सातारा जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

उदयनराजे २ लाख मतांनी पडणार; पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी

उदयनराजे म्हणतात ‘स्टाईल इज स्टाईल’, कमिटमेंट कायम राहणार

पुढील सात दिवस सरकारी कार्यालये राहणार बंद

Coronavirus : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, या’ गाड्या ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण

 

फडणवीसांशी जवळीक असणार्‍या शंभुराज देसाईंना गृह (ग्रामीण), वित्त खाते

सातारा प्रतिनिधी | महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ खातेवाटपाची यादी नुकतीच जाहीर झाली असून यामध्ये अनेक नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. देसाई यांना राज्यमंत्री पद दिल्याने पाटण तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. शंभुराज शिवाजीराव देसाई यांनागृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन … Read more

मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे ‘हे’ ६ आमदार नाराज, सामनातूनही नाराजीचा सूर

मुंबई । महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेत अनेकजण नाराजी असल्याची माहिती समोर येते आहे. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्यांना संधी न देता पक्षाने तीन अपक्ष आमदारांना संधी दिल्याने हा नाराजीचा सूर आहे. एकीकडे मुंबईतून सुनील राऊत यांना संधी न मिळाल्याने ते … Read more

शरद पवारांचे धक्कातंत्र, गृह खाते विदर्भाला?

विशेष प्रतिनिधी | लोकांशी थेट संबंध येणारे आणि प्रतिष्ठेचे गृह खाते विदर्भाला देण्याचे योजून राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी मोठा गेम खेळला आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि गृह खाते देण्यात येईल असे मानले जात होते. अधिकृत खातेवाटप अजून जाहीर झालेले नाही. पण खास गोटातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गृह खाते विदर्भातील ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना देण्याचा … Read more

पाटणचे आमदार शंभुराज देसाईंना राज्यमंत्रीपद

सातारा प्रतिनिधी | महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची यादी नुकतीच जाहीर झाली असून यामध्ये अनेक नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. देसाई यांना राज्यमंत्री पद दिल्याने पाटण तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. देसाई हे तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. याबरोबरच … Read more

आदित्य ठाकरे यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश

मुंबई | पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे यांचा समावेश होणार की नाही अशी चर्चा सुरू होती. अखेर आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांना राज्यमंत्री पद मिळेल अशी शक्यता असताना … Read more

ज्येष्ठांना डावलून ‘या’ तरुण चेहर्‍यांना मिळणार मंत्रीपद, पहा संभाव्य मंत्र्यांची यादी

मुंबई | उद्या 30 डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. शिवसेनेच्या खात्यातून बच्चू कडू यांना मंत्रिपद दिले जाईल. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेल्या अदिती तटकरे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी निश्चित समजली जाते. … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे?

झुंजार आणि लढवय्या नेते म्हणून ओळख असलेल्या शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे.

आमचं स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे;मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार

उद्धव ठाकरेंनी राज्यपालांनी मराठीत केलेल्या भाषणाचा दाखल देत, राज्यपालांनाही सत्ताबदलाचे वारे समजू लागले असल्याचा चिमटा काढला आहे.

भाजप सेनेच्या आमदारांची सभागृहातच हाणामारी; जयंत पाटील, फडणवीस धावले मदतीला

टीम, HELLO महाराष्ट्र| सोमवार पासून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने सावरकरांच्या मुद्यावरून आक्रमक पवित्र घेत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तर आज विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली. या वेळी सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेनेच्या आणि भाजपच्या आमदारांमध्ये सभागृहातच हाणामारी झाली आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. … Read more