जयंत पाटलांकडे जलसंपदा खाते आल्याने सांगली जिल्ह्यातील सिंचन योजना पूर्ण करण्याचे आव्हान
राज्याचे जलसंपदा खाते जयंत पाटील यांच्याकडे आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या असून ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, वाकुर्डे या योजनांच्या पुर्ततेला आता गती येईल. जतच्या ४२ गावांचा प्रश्न मार्गी लागले, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राजारामबापूंच्या पावलावर पाऊल ठेवून ते या योजनांसाठी ५ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतो.