वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला भीक घातली नाही – सुधीर मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या आजच्या शक्तिप्रदर्शनावर भाष्य केलं आहे. मुनगंटीवार म्हणाले की ‘वनमंत्री संजय राठोड हे आज पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करत नसून हे तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हानच आहे. कोरोना नियमांची पायमल्ली करून ते एक प्रकारे आव्हान प्रदर्शनच करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना … Read more

राज्य सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्र सरकारवर फोडू नये; चंद्रकांत पाटील कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभर कोरोना विषाणूचा संसर्ग हा पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.बऱ्याच ठिकाणी नाइट कर्फ्यू, लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे, या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्रावर फोडू नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री … Read more

कोरोना वाॅर्डात काम करणार्‍या डाॅक्टर, नर्स यांच्यासाठी Good News; वातानुकुलित PPE कीट चे यशस्वी संशोधन

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जगभर अनेक प्रकारच्या विषाणूजन्य साथीच्या रोगांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा साथीच्या विविध रोगांवर उपचार करण्यारे अनेक डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा द्यावी लागते. तसेच संसर्ग टाळण्यासाठी संबंधित आजारावर उपचार करताना डॉक्टर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट घालणे अनिवार्य आहे. मात्र असा पीपीई … Read more

सीमेवरील ताणतणाव कमी झाल्यानंतर भारत आता चीनकडील 45 गुंतवणूकीच्या प्रस्तावांना मान्यता देणार : रिपोर्ट

नवी दिल्ली । आता चीनच्या 45 गुंतवणूकीच्या प्रस्तावाला भारत मान्यता देणार आहे. या गुंतवणूक प्रस्तावांमध्ये ग्रेट वॉल मोटर आणि चीनच्या SAIC मोटर कॉर्पोरेशनची नावेही आहेत. वृत्तसंस्थेच्या रॉयटर्सने इंडस्ट्री सूत्रांच्या हवाल्याने एका अहवालात ही माहिती दिली आहे. भारत आणि चीन यांच्या सीमेवरचा ताण कमी झाल्यानंतर अलीकडेच ही बातमी समोर येत आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेशातील सैनिकांमधील संघर्षानंतर … Read more

इन्शुरन्स ट्रेंड: कंपन्या देत आहेत आपल्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष, ग्रुप इन्शुरन्स 11 टक्क्यांनी वाढला

नवी दिल्ली । जानेवारीत, नॉन लाईफ इन्शुरन्स कंपन्यांच्या प्रीमियम कलेक्शनमध्ये 6.7% वाढ झाली. जानेवारी 2020 च्या तुलनेत जानेवारी 2021 मध्ये हेल्थ इन्शुरन्स मध्ये 14.6% वाढ झाली आहे. जनरल इन्शुरन्स कौन्सिलच्या म्हणण्यानुसार 25 जनरल विमा कंपन्यांनी जानेवारीत त्यांच्या ग्रुप प्रीमियममध्ये 10.8% वाढ नोंदविली आणि ते 16,247.24 कोटी रुपयांवर पोहोचले. जानेवारी 2020 मध्ये ते 14,663.40 कोटी रुपये … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे दर का वाढत आहेत? धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितली दोन कारणे

नवी दिल्ली । देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी (Petrol-Diesel Price) नव्याने उचांक गाठले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट झाल्याचे कारण देत इंधनाच्या किंमती वाढल्या असल्याचे सांगितले. धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, इंधनाच्या वाढत्या दरामागील दोन प्रमुख कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (Crude Oil) उत्पादन कमी केले गेले … Read more

आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना; गिरीश महाजनांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला

जळगाव | सध्या राज्यभर कोरोना आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया तर दिलीच वर एकनाथ खडसे यांना देखील टीकेचे लक्ष केले. महाजन म्हणाले की, राज्यात कोरोना आहे, पण आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना आहे. नुकताच पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस वासी झालेले ज्येष्ठ नेते … Read more

बा विठ्ठला ! कोरोना मुळे यंदाची माघी वारी देखील रद्द

सोलापूर | “पंढरीची वारी आहे माझे घरी, वारी चुको न दे हरी” असं अभिमानाने सांगणारा महाराष्ट्रातला बहुसंख्य वारकरी, माळकरी वर्ग आहे. पण यंदा मात्र कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आषाढवारी रद्द करण्यात आली होती. नंतर त्यापुढची माघीवारी देखील रद्द करण्यात आलं आहे. म्हणून बा विठ्ठला ! तुझ्या वारीसाठी अजून किती दिवस तिष्ठत ठेवशील आम्हाला अशी भावना … Read more

सांगली जिल्ह्यात यात्रा, जत्रा, ऊरुसावर घालण्यात बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, शिवाय सोशल डिस्टन्ंिसगसह नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक यात्रा, जत्रा उरूसावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ धार्मिक विधी करण्यास परवानगी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले. ज्या गावात यात्रा, ऊरुस भरणार आहे, त्या ठिकाणी नजर ठेवण्याचे आदेश … Read more