मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, सगळ्या मंत्र्यांना घरी बसवतो; अभिजीत बिचकुलेचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सातारा | राज्यावर पुन्हा लॉकडाऊनचा संकट आणण्याच्या मनस्थितीत मंत्रिमंडळ आहे. सगळं सुतासारख सरळ करतो. यांच्या मंत्र्याना दोन मिनिटांत घरी बसवतो. तेव्हा लॉकडाऊनच संकट येवू नये म्हणून तुम्ही मला एक दिवसांचा मुख्यमंत्री करा अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी केली आहे. अभिजीत बिचकुले म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या … Read more

Q3 GDP DATA: अर्थव्यवस्थेबाबत समोर आली चांगली बातमी, तिसर्‍या तिमाहीत जीडीपीमध्ये झाली 0.4% वाढ

नवी दिल्ली । या आर्थिक वर्षाच्या (2020-21) डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीसाठी केंद्र सरकारने सकल देशांतर्गत उत्पाद (GDP) डेटा शुक्रवारी सायंकाळी जाहीर केला. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था चांगली वाढली आहे. तिसऱ्या तिमाहीत जीडीपीची वाढ 0.4 टक्के आहे. मागील दोन तिमाहीत कोरोना विषाणूच्या साथीमुळे मोठ्या प्रमाणात घट नोंदविण्यात आली. दुसऱ्या तिमाहीत 7.5 टक्के घट … Read more

देशातील या पाच राज्यांत निवडणुका जाहीर; जाणुन घ्या तारखा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगाल, आसामसह तमिळनाडू, केरळ या राज्यात आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात येत्या काही दिवसातच निवडणुका होणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली आहे. आज निवडणूक आयोगाने या पाचही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. त्यामुळे या राज्यांमधील निवडणुकांकडे लक्ष ठेऊन असलेल्यांची प्रतिक्षा संपलीय. … Read more

‘बेकायदेशीरपणे लस घेतल्याप्रकरणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व आमदार रवींद्र फाटक यांच्यावर तात्काळ कारवाई करा’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  कोरोना नियमावली वरून भाजप नेत्यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे काही नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नियमांच्या बाहेर जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली आहे, हे अत्यंत संतापजनक असून पूर्णत: बेकायदेशीर आहे, यातून शिवसेनेची मानसिकता काय आहे याचा हा ढळढळीत पुरावा असल्याची घणाघाती … Read more

सरपंच असावा तर असा..! पहा का होतंय कौतुक

 बीड प्रतिनिधी | अनवर शेख एकदा का निवडणूक झाली आणि सरपंच पदाची माळ आपल्या गळ्यात पडली की या पदाचा तोरा मिरवणार्‍यांची आपल्या कडे कमी माही मात्र गावच्या सरपंच पदी निवड झाल्यानंतर तिसर्‍याच दिवशी स्वतः विजेच्या खांबावर चढुन आठ दिवसापासून अंधारात असलेल्या गावच्या विजेचा प्रश्न मार्गी लावत गावाप्रति काम करण्याची तळमळ व सरपंच पदाचे कर्तव्य बजावत … Read more

लॅपटॉप, टॅब्लेट आणि पीसी तयार करण्यासाठी PLI योजनेस मंत्रिमंडळाने दिली मान्यता

नवी दिल्ली । लॅपटॉप, टॅब्लेट, ऑल-इन-वन पीसी आणि सर्व्हरच्या उत्पादनास प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने प्रॉडक्शन लिंक्ड प्रोत्साहन PLI (Production Linked Incentive) योजनेस मान्यता दिली आहे. या PLI योजनेद्वारे देशांतर्गत उत्पादन क्षेत्रात जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्याचा सरकारचा मानस आहे. या हाय-टेक आयटी हार्डवेअर गॅझेटसाठी पीएलआय योजना मंजूर होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात दूरसंचार उपकरणे तयार करण्यासाठी 12,195 … Read more

कुलूप लावलेले “कोविड सेंटर” पुन्हा होणार सुरू; कोरोना रुग्णांची प्रचंड वाढणारी संख्या ठरली कारणीभूत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (धुळे प्रतिनिधी) | कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढू लागली असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा,शिरपूर आणि धुळे या ठिकाणी कुलूपबंद केलेली कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवारी एकूण ४५ जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत तर मंगळवारी ६५ अहवाल पॉझीटिव्ह … Read more

राज्यात एका भगिनीचा जीव गेला, सगळा महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरून राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. वनमंत्री संजय राठोड यांचं नावं सतत त्या प्रकरणाशी जोडलं जातंय. या प्रकरणावर १५ दिवस मौन धरल्यानंतर राठोड यांनी काल पोहरादेवी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत बदनामी केली जात असल्याचा दावा केला. मात्र, राज्यात करोनाचं संकट गडद होत असताना राठोड यांनी केलेल्या गर्दीवरून आता … Read more

Lockdown चा निर्णय लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता घेतल्याचा राणांचा आरोप

अमरावती |  अनलॉक नंतर कोरोनाचा विस्फोट होणार देशातील पाहिलं शहर म्हणजे अमरावती. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख बघता लॉकडाउन करण्यात आला. मात्र जिल्ह्यात लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेला लॉकडाउन हा फोल ठरला आहे असा आरोप खासदार नवणीत राणा यांनी केला आहे. मंगळवारी 972 म्हणजे आतापर्यंतची लॉकडाउन असताना रुग्णसंख्या आढळली आहे. या … Read more

वीज बिलाची वसुली करायला आलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यांना माजी कृषीमंत्र्यांनी काढले गावाबाहेर; पहा Video

अमरावती | सध्या अमरावतीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. परिणामी जिल्ह्या प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन केलाय. या लॉकडाउनमुळे अनेकांची कामे थांबली असताना महावितरणचे कर्मचारी विद्युत बिलाची वसुली करत आहेत. अमरावती जिल्ह्यातील सुरळी गावामध्ये महावितरणचे कर्मचारी विजतोडनी करिता दाखल झाले असताना त्या ठिकाणी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे पोहचले. त्यांनी अमरावतीमध्ये लॉकडाऊन असताना विजतोडणी का … Read more