दुर्दैवाने सुशांतला आत्महत्येनंतर जास्त प्रसिद्धी मिळतेय; जयंत पाटलांनी व्यक्त केली खंत

मुंबई । बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्हत्येला एक महिना उलटून गेला असला तरी हे प्रकरण थांबायचं नाव घेत नाही. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या वडिलांनी देखील बिहारमध्ये तक्रार दाखल केली आहे. रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील … Read more

प्रिया बेर्डे यांच्या नंतर आता ‘ही’ मराठी अभिनेत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ आता आणखी एक अभिनेत्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे सविता मालपेकर. सविता मालपेकर या आता राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ त्यांच्या हाती बांधतील. तसेच त्यांच्यासोबत गीतकार आणि अभिनेते असेलेले बाबा सौदागर, अभिनेत्री अर्चना नेवरेकर हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये … Read more

मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो, फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते – चंद्रकांत पाटील 

मुंबई । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोरोना काळात सरकार किती निष्क्रिय आहे हे सांगण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. आता त्यांनी परत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला मदत मागण्यासाठी त्यांचा इगो आडवा येतो असे वक्तव्य केले आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या … Read more

राजू शेट्टींना राष्ट्रवादीने दिली विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर

कोल्हापूर । राज्यात मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर देण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर दिली असल्याचे समजत आहे. जयंत पाटील … Read more

मग मोदींनी राबवलेली ‘स्किल इंडिया’ योजना फेल गेली का?; जयंत पाटील यांचा फडणवीसांना सवाल

मुंबई । महाविकास आघाडी सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीची पोलखोल करत वास्तविक माहिती दिली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील भूमिपुत्रांसंबंधी केलेल्या  वक्तव्याचा जयंत पाटील यांनी समाचार घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या आपल्या पत्रकार परिषदेत … Read more

राज्यात लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात जयंत पाटील म्हणाले..

मुंबई । देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्गावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नाही आहे. त्यातच आता लॉकडाऊनचा चौथा टप्पाही संपुष्टात येतो आहे. त्यामुळे, राज्यात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लॉकडाऊनबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. येत्या २९ तारखेला आम्ही राज्यातील लॉकडाऊनच्या … Read more

केंद्राने हक्काचेही पैसे दिले नाही, अन फडणवीस हवेतील आकडे दाखवतात- अनिल परब

मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्राला केंद्राकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीची माहिती देऊन अभासी चित्रं निर्माण केलं आहे. मात्र, वास्तव चित्रं वेगळच आहे. केंद्राकडेच राज्याचे ४२ हजार कोटींचा निधी थकीत असून करोना संकटाच्या काळातही हा निधी राज्याला मिळालेला नाही. राज्याला केंद्राकडून हक्काचेही पैसे दिले जात नाहीत, मात्र फडणवीस हवेतील आकडे दाखवून अभासी … Read more

पंतप्रधान मोदींनी तरी कुठे घराबाहेर पाऊल टाकलं? भाजपच्या टीकेला जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

मुंबई । कोरोना व्हायरसचं संकट रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने आज आंदोलन केलं. सरकारच्या अपयशाच्या निषेधार्थ भाजपनं आज राज्यभरात ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ हे आंदोलन केलं. ‘काळे मास्क, काळे शर्ट, काळी रिबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध केला. महाराष्ट्र भाजपच्या या सरकारविरोधी आंदोलनाचा समाचार घेतानाच या आंदोलनापासून जनतेनं सावध राहावं, असं आवाहन … Read more

केंद्राच्या पॅकेजमध्ये फोलपणा दिसल्यावरचं फडणवीसांनी राज्याकडे पॅकेजची मागणी केली- जयंत पाटील

मुंबई । केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी करत आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे. शिवाय “केंद्राने राज्याला पैसे दिले … Read more

दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी! जयंत पाटलांनी हाणला चंद्रकांतदादांना आंदोलनांवरून टोला

मुंबई । राज्यात कोरोना साथीवर नियंत्रण मिळवण्यात महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने २२ मे रोजी ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनाची हाक दिली असून त्यावरून राज्यातील राजकारण चांगलाच तापू लागलं आहे. या आंदोलनाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सूचना देणारं एक पत्रक काढलं असून त्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाटील यांनी भाजपला … Read more