नाशिकच्या सरकारी करन्सी प्रिंटिंग प्रेसमधून पाच लाख रुपये गायब

नाशिक । पाच लाख रुपयांच्या चोरीची खळबळजनक घटना महाराष्ट्रातील नाशिकमध्ये असलेल्या शासकीय करन्सी नोट प्रेसमधून (Currency Printing Press) समोर आली आहे. देशातील सर्वात सुरक्षित करन्सी नोट प्रेसमधून चोरी झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या संदर्भात अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. कडक सुरक्षा व्यवस्था असूनही प्रशासन पैसे कुठे गेले याचा तपास करत आहे. या सर्व … Read more

राज्यात उद्यापासून पूर्व मोसमीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता, आकाश राहिल निरभ्र

पुणे | उद्यापासून (15एप्रिल, गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी चा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. बुधवारी राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकची … Read more

हा तालुका माझ्या आई – बापाने मोठ्या कष्टाने उभा केलाय; इथे तुमचे झेंडे लागू देणार नाही

औरंगाबाद | कन्नड हा तालुका माझे वडील स्व. रायभान जाधव व मातोश्री तेजस्विनी जाधव यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेला तालुका आहे या ठिकाणी तुमच्या सारख्यांचे झेंडे लागू देणार नाही, असा इशारा देत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी थेट केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. हर्षवर्धन जाधव हे जेल मधुन सुटून आल्यावर काल एका … Read more

30 गुंठ्यांत घेतले 10 टन टरबूजाचे उत्पादन! दुबईला निर्यात करून तरुणाने कमावले लाखो रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पारंपारिक शेतीमध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न घेता येत नाही. पण, आधुनिक तंत्रज्ञानातून शेती केली आणि मार्केटिंगचे तंत्र शिकून घेतल्यास शेतकरीही मोठा नफा शेतीमधून कमवू शकतो. असा यशस्वी प्रयोग बीडमधील, अंबाजोगाईतील देवळा या गावातील प्रयोगशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी यशस्वी केला आहे. तरुण प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. देवरवाडे यांनी आपल्या … Read more

महाविकास आघाडी सरकारने ‘महापोर्टल’ केलं बंद; ४ नव्या कंपन्यांच्या माध्यमातून होणार भरती प्रक्रिया

मुंबई । राज्यात ‘महापोर्टल’च्या माध्यमातून होणाऱ्या नोकर भरतीला अनेकांनी विरोध केला होता. त्यामुळे राज्य सरकारने आता हे ‘महापोर्टल’ स्थगित करत ४ नव्या कंपन्यांची भरती प्रक्रिया करण्यासाठी निवड केली आहे. निवड करण्यात आलेल्या सदर ४ कंपन्यांद्वारे पुढील ५ वर्षे पदभरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. लवकरच याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद … Read more

चंद्रपूरची 59 व्या महाराष्ट्र राज्य हिन्दी नाट्य स्पर्धेत बाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 59 व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत विदर्भाने बाजी मारली असून, चंद्रपूरच्या ‘हॅलो राधा मे रेहाना’ या नाटकाने निर्मितीच्या प्रथम पारितोषिकासह राज्यात अव्वल ठरण्याचा मान प्राप्त केला आहे. बेळगावच्या ‘भूमिका’ या नाटकाला द्वितीय तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, चिंतामणनगर शाखेच्या ‘रूद्राली’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे. राज्याच्या सांस्कृतिक … Read more

कराडातील चौघे दोन वर्षाकरिता तडीपार; सातारा जिल्ह्यासह कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्यातून तडीपार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहराच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी, बेकायदा हत्यार बाळगणे, खंडणी मागणारे, जबरी चोरी करणारे, सरकारी कामात अडथळा आणून जखमी करणे असे गंभीर स्वरूपाचे शरीराविरूध्द गुन्हे दाखल असलेल्या चौघांना सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, कराड शहरात टोळीचा प्रमुख अभिनंदन … Read more

‘दारूबंदीला समर्थन देणाऱ्या गावांचा आकडा एक हजार पार’-ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र

गडचिरोली | जिल्ह्यात अनेक आंदोलनानंतर १९९३ मध्ये दारूबंदी कायदा लागू करण्यात आला. सलग २७ वर्ष टिकून असलेल्या दारूबंदीला धक्का लागण्याची शक्यता बळावली असता जिल्ह्यातील १ हजार २ गावे दारूबंदीच्या समर्थनात उभी आहेत. या ऐतिहासिक दारूबंदीची अंमलबजावनी करा, असे पत्र देखील या गावांनी शासनाला लिहिले आहे. सद्या जिल्हा दारूमुक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

शेतकऱ्यांना हवे संरक्षित स्वातंत्र्य – प्रा.सुभाष वारे

पुणे | गेली ४८ वर्षाची सत्यशोधकी विचारांची परंपरा राखत महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रंथालय व वाचनालय आयोजित फुले आंबेडकर व्याख्यानमालेचे चौथे सत्र पार पडले. केंद्राचा सुधारित कृषी कायदा या विषयावर कॉ.किशोर ढमाले यांनी वक्ता व प्रा.सुभाष वारे यांनी अध्यक्ष या नात्याने भूमिका मांडली. किशोर ढमाले यांनी कल्याणकारी राज्याच्या भूमिकेत रेशनची व्यवस्था आणि बाजार समितीची रचना … Read more

दसरा-दिवाळीच्या निमित्ताने रेल्वे सुरु करणार 120 खास गाड्या, गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा, दिवाळीच्या निमित्ताने सध्या चालणार्‍या बहुतांश विशेष गाड्यांची (Special Trains) वेटिंग लिस्ट 100 च्या वर गेली आहे. म्हणूनच रेल्वेने आणखी नवीन गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. सीएनबीसी आवाज कडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे 120 फेस्टिव स्पेशल ट्रेन सुरु करण्याची योजना तयार करीत आहे. मात्र कोरोना साथीच्या आजारामुळे महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या राज्य … Read more