किरकोळ कार्यकर्त्यांसारखे राजनाथ सिंग टीव्हीवर टीका करतायत – पृथ्वीराज चव्हाण 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भाजपाचे नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री यांनी महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राजनाथ सिंह यांना उत्तर दिले आहे. आणि अशा पद्धतीने स्वतःचे काम करण्यास अपयशी ठरल्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी छोट्या राजकीय कार्यकर्त्यांसारखी टीका करणे … Read more

म्हणुन फडणवीसांनी मानले शिवसेनेचे आभार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात अभिनेता सोनू सूद याने स्थलांतरितांना घरी पोहोचविण्यासाठी गाड्यांची उपलब्धता करून दिली होती. यानंतर माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘सोनू सूदचा भाजपने प्यादा म्हणून वापर करून त्याला समाजसेवकाचा मुखवटा लावला’ असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला उत्तर … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळ नुकसान पाहणीसाठी शरद पवार उद्यापासून २ दिवस कोकण दौऱ्यावर

मुंबई । ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शरद पवार हे २ दिवस कोकण दौरा करणार आहेत. आपल्या कोकण दौऱ्यात शरद पवार रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून ते शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

‘या’ तारखेला मुंबईत मान्सून होणार दाखल

मुंबई । नुकत्याच होऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मान्सून उशिरा येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु १ जूनला मान्सून केरळ मध्ये अगदी नियोजित वेळेत पोहोचला होता. तसेच तो तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांपर्यंतही सहज पोहोचला होता. त्यामुळे आधी अंदाज वर्तविण्यात आलेल्या वेळेत अर्थात पुढील दोन तीन दिवसात मान्सून मुंबई मध्ये दाखल होईल असे … Read more

निसर्गग्रस्तांना १०० कोटींची मदत तुटपुंजी; राज्य सरकारने ७५ टक्के नुकसान भरपाई द्यावी- फडणवीस

मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज फेसबुकद्वारे पत्रकार परिषद घेऊन चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना अधिक मदत करण्याची मागणी केली. राज्य सरकारने चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगडला १०० कोटींची केलेली मदत अत्यंत अपुरी आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी असून नुकसानग्रस्तांना नुकसानाच्या ७५ टक्के मदत जाहीर करावी, असं ते म्हणाले. चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. … Read more

‘निसर्गग्रस्त’ रायगड जिल्ह्याला तातडीची १०० कोटींची मदत- मुख्यमंत्री ठाकरे

रायगड । निसर्ग चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. या चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान झालेले पाहता रायगड जिल्ह्यासाठी राज्य सरकारने तातडीने १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अलिबागमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केल्यानंतर तातडीच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. यावेळी वादळामुळे इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीनुसार मदत जाहीर करणार असंही त्यांनी … Read more

निलेश राणेंकडून अजित पवारांची स्तुती; परिस्थिती आणि प्रशासन हाताळण्याच्या कौशल्याचे केले कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच महाराष्ट्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळ येऊन गेले. यामुळे कोकण परिसरातील किनारपट्टी भागातीप गावांचव मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळामुळे पुणे जिल्ह्याच्याही काही भागांमध्ये नुकसान झाले आहे. या नुकसानीची उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी बोलून माहिती घेतली. तसेच याचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी … Read more

मुंबईवरील ‘निसर्गा’चे संकट टळल्यावर मुख्यमंत्री ठाकरे हवामान खात्याला म्हणाले..

मुंबई । महाराष्ट्रावरील ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट टळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हवामान खात्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या वाटचालीविषयी अचूक अंदाज दिल्यानं उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरध्वनी करुन त्यांचे अभिनंदन केले. हवामान खात्याने योग्य अंदाज वर्तवल्याने राज्य सरकारला चांगली तयारी करता आली, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. … Read more

वंचित च्या माजी आमदारांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश 

मुंबई । अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज वंचित बहुजन आघाडीमधून राजीनामा देत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर हा रीतसर पक्ष प्रवेश झाला आहे. मुंबईत आज निसर्ग चक्रीवादळ घोंगावत असतानाच हे राजकीय वादळ ही … Read more

पुण्यात पुढचे २४ तास काळजीचे; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

पुणे । गेले दोन दिवस चर्चेत असणारे ‘निसर्ग’ हे चक्रीवादळ आज महाराष्ट्रात येऊन धडकले आहे. अरबी समुद्रातून आलेले हे चक्रीवादळ आज दुपारी महाराष्ट्रातील अलिबाग पासून ५० किमी असणाऱ्या किनारपट्टीवर धडकले. शहर आणि परिसरात गेल्या २४ तासात संथ सारी कोसळत आहेत. दुपारी जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडला होता. पुढच्या २४ तासात वादळी वाऱ्यासह संततधार कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान … Read more