‘एक देश एक रेशन कार्ड’ योजना आजपासून सुरु, स्थलांतरितांना मिळणार दिलासा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील संचारबंदीचा पाचवा टप्पा सुरु झाला आहे. ठिकठिकाणचे स्थलांतरित कामगार आपापल्या गावी परतत आहेत.  आहे त्या ठिकाणीच अडकले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील अशा गरीब तसेच स्थलांतरित कामगारांसाठी आशादायक गोष्ट घडली आहे. एक देश एक रेशन कार्ड ही योजना आजपासून देशभरात सर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश याठिकाणी सुरु … Read more

संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर तो लांबविण्यासाठी होती – सुजय विखे पाटील 

अहमदनगर । देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन काही नियम शिथिल करून देशातील संचारबंदी ३० जूनपर्यंत  आली आहे. गेल्या २ महिन्यापेक्षा अधिक काळातील संचारबंदीमध्ये हळूहळू नियम शिथिल केल्यामुळे रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.  मात्र भाजपाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या एका विधानाने  ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी ही संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर कोरोना लांबविण्यासाठी करण्यात आली असल्याचे … Read more

सलमान खानने मुंबई पोलिसांना दिले ‘हे’ गिफ्ट; मुख्यमंत्री ठाकरेंनीही केले कौतुक

मुंबई । अभिनेता सलमान खान हा त्याच्या अभिनयासोबत नेहमीच अनेकांना मदत केल्याबद्दल चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये बऱ्याचजणांना उभे करण्यासाठी सलमानने मदत केल्याचे म्हंटले जाते. काही अभिनेत्रींना त्याने ब्रेक दिल्याच्याही चर्चा असतात. यासोबत बिईंग ह्युमन या त्याच्या संस्थेद्वारे तो समाजातील गरजूनाही मदत करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या घरातून काही गरजूना आपल्या घरातून धान्य आणि जीवनावश्यक किट … Read more

लाॅकडाउन उठवल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता – रोहित पवार

मुंबई । कोरोना प्रादुर्भावामुळे देशात मागील दोन महिन्यांपासून देशात संचारबंदी राबविण्यात आली आहे. यादरम्यान उद्योग व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रमुख शहरामध्ये संचारबंदी आहे. पर्यायाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत प्रभावी घसरण झाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारसोबत राज्य सरकार संचारबंदीचे नियम शिथिल करण्यावर विचार करत आहेत. … Read more

Lockdown 5.0 | पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगांना मिळणार सूट? 

वृत्तसंस्था । देशातील चौथ्या टप्प्यातील संचारबंदी ३१ मे  रोजी संपत आहे. यापुढे संचारबंदी उठवली जाणार नसली तरी काही नियम शिथिल करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार मुख्यत्वे देशातील १३ शहरांवर जिथे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून आहे. केंद्र सरकारला संचारबंदीमुळे घसरलेल्या अर्थव्यववस्थेला पुन्हा उभी करण्यासाठी काही राज्यांनी पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसाय सुरु करण्याचा … Read more

कोरोनामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, अन्यथा – रोहीत पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  आज कोरोनाने विळखा घातला आहे. मोठमोठे देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था संतुलित राहणे कठीण आहे. संचारबंदीच्या काळात ती ढासळली आहेच. पण पुढचे बरेच दिवस ती व्यवस्थित मार्गावर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. देशातील बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे लोकांच्या भुकेचा प्रश्न निर्माण होतो आहे या परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा … Read more

शाळेने वाढीव शुल्क आकारल्यास या नंबरला फोन करुन तक्रार करा – शिक्षणमंत्री

मुंबई । देशाच्या सध्याच्या कोरोनाकाळात अर्थव्यवस्था ढासळली आहे. तर बहुतांश साऱ्याच सामान्य, मध्यमवर्गीय लोकांची आर्थिक गणिते चुकली आहेत. दोन महिन्यांच्या संचारबंदीनंतर अनेकांकडे काम नाही आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे कपात आहे. या काळात मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी शाळांनी वाढीव शुल्क आकारले तर पालकांची भांबेरीच उडणार आहे. मात्र यावर राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी शाळांना वाढीव शुल्क आकारण्यास बंदी घातली … Read more

या १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. रोज रुग्णसंख्येत वाढ होते आहे. काही राज्यांमध्ये संख्या कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये रुग्ण संख्या वाढतेच आहे. आसाममध्ये देखील गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात संख्या वाढते आहे. देशातील एकूण १३ शहरामध्ये ७०% कोरोनाबाधित रुग्ण … Read more

दूरदर्शनवर भरणार शाळा? राज्य सरकारने केंद्राकडे मागितली वेळ

नवी दिल्ली । राज्यातील कोरोना संकट अद्याप स्थिर आहे. त्यामुळे दरवर्षी १५ जूनला सुरु होणाऱ्या शाळा यावर्षी संचारबंदीनंतर कधी सुरु करायच्या यावर शासन विचार करत होते. राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी काही दिवसापूर्वी यासंदर्भात एक आढावा बैठकही घेतली होती. या बैठकीत राज्यातील शाळा १५ जूनला सुरु होण्याची कोणतीच शक्यता वर्तविण्यात आली नव्हती. मात्र एका मुलाखतीत मुख्यमंत्री यांनी … Read more

कोरोना बचावासाठी मंचरचा छत्री पॅटर्न; मुख्यमंत्रांनीही घेतली दखल

पुणे । कोरोनाचे संक्रमण सुरु झाल्यापासून मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे हे त्यांच्या घरी राहत नाहीत. त्यांनी त्यांचा मुक्काम ग्रामपंचायत कार्यालयातच हलविला आहे. संचारबंदीची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांनी आता मंचरमधील नागरिकांना कोरोना बचावासाठी एक नवीन युक्ती सुचविली आहे तसेच ती अंमलातही आणली आहे. त्यांनी लोकांना छत्री वापरण्यास सांगितले आहे. ज्यामुळे … Read more